सेक्यूलर मंडळींची विकृती!

•चौफेर : अमर पुराणिक•
प्रत्येक गोष्टीला पंतप्रधान मोदींना जबाबदार धरण्याची चढाओढ चालवली आहे. स्वत:ला विद्वान म्हणवून घेणार्‍या लेखक-विचारकांचा एक समुह हेच काम करतोय. ही लेखक मंडळी धडाधड साहित्य अकादमी पुरस्कार परत करत आहेत. ही तथाकथित विचारक मंडळी एक असे वातावरण निर्माण करु पहात आहेत की, देशात प्रचंड असहिष्णूता माजली आहे, सामाजिक असंतोष पसरला आहे. पण वस्तूस्थिती ही आहे की हिच सेक्यूलर विद्वान मंडळी समाजात धार्मिक तेढ निर्माण करत आहेत. हिंदू-मुस्लिमांमध्ये तणाव निर्माण करण्याचा उद्योग करत आहेत.
दादरीच्या घटनेनंतर सेक्यूलर मंडळींनी आपल्या असंबद्ध वागण्या-बोलण्याचा कहर केला आहे. दादरीतली मूळ घटना काय घडली आहे, तेथील वस्तूस्थिती काय आहे याचा कोणताही अभ्यास न करताच आपली सद्सद् विवेकबुद्धी गहाण ठेवून प्रत्येक गोष्टीला पंतप्रधान मोदींना जबाबदार धरण्याची चढाओढ चालवली आहे. स्वत:ला विद्वान म्हणवून घेणार्‍या लेखक-विचारकांचा एक समुह हेच काम करतोय. ही लेखक मंडळी धडाधड साहित्य अकादमी पुरस्कार परत करत आहेत. ही तथाकथित विचारक मंडळी एक असे वातावरण निर्माण करु पहात आहेत की, देशात प्रचंड असहिष्णूता माजली आहे, सामाजिक असंतोष पसरला आहे. पण वस्तूस्थिती ही आहे की हिच सेक्यूलर विद्वान मंडळी समाजात धार्मिक तेढ निर्माण करत आहेत. हिंदू-मुस्लिमांमध्ये तणाव निर्माण करण्याचा उद्योग करत आहेत.
या सेक्यूलर मंडळींना गोहत्येचा विरोध करणार्‍यांचा राग येतो, या सेक्यूलरांना पाकिस्तानी लेखकाच्या पुस्तकाच्या भारतातील प्रकाशन कार्यक्रमाला झालेल्या विरोधाचा राग येतो. यांना गुलाम अलीच्या कार्यक्रमाला विरोध केल्याबद्दलही राग येतो. यांना पाकिस्तानी अभिनेत्यांना, कलावंतांना भारतात आमंत्रित केल्याचा विरोधाचाही राग येतो. दहशतवादी कसाब, मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणणार्‍या याकुब मेमनला दिलेल्या फाशीचाही राग येतो. पण कोठे हिंदू बळी ठरला तर मात्र हे सेक्यूलर विचारवंत वाळूत तोंड खूपसून बसतात. अशा या सेक्यूलर विद्वानांचा मानवतावादाचा दावा खोटा आहे. यांच्या वागण्याचा अर्थ असाच होतो की मानवतावादाच्या नावाखाली ही मंडळी पाकिस्तानचे समर्थन करतात.
मूळात साहित्य अकादमीचा भारत सरकारशी कसलाही थेट संबंध नाही, ती एक स्वायत्त संस्था आहे. तरीही हे लादण्याचा प्रयत्न केला जातोय की साहित्य अकादमी मोदी सरकारचे आहे. साहित्य अकादमी पुरस्कार परत करणारे कॉंग्रेस सरकारच्या काळात झालेल्या हत्यांचाही आरोपही मोदी सरकारवर लादण्याचा प्रयत्न करताहेत. ते असहिष्णूता वाढलेली आहे, सेक्यूलरिझम आणि स्वातंत्र्य धोक्यात आल्याची कोल्हेकुई करण्याचा प्रयत्न करत आहेत. लेखक मंडळी एकएक करुन पुरस्कार परत करुन हे भासवण्याचाच प्रयत्न करत आहेत. यातून ही मंडळी सेक्यूलरिझमच्या विकृतचालीला बळी पडलेले दिसत आहेत.
२३ जून २०१५ रोजी एक तरुण खेळण्यातली बंदूक घेवून आपली सेल्फी काढत होता तेव्हा पाकिस्तानी पोलिसांनी त्याची हत्या केली. तेव्हा न पाकिस्तानने याचा विरोध केला न या सेक्यूलरांनी आवाज उठवला. जर इज्राईल पोलिसांच्या गोळीने कोणी पॅलेस्तीनी नागरिक घायाळ झाला तर जगभरातले वामपंथी आणि सेक्यूलर मंंडळी गदारोळ करतील, सेक्यूलर पत्रकार, लेखक भरभरून रकाने लिहून इज्राईलचा निषेध करतील. जेव्हा अमेरिकेने इराकवर हल्ला केला तेव्हा जगभरातील सेक्यूलरांनी युद्धाच्या विरोधात निदर्शनं आणि लेखन केले. नुकतेच सौदी अरबने यमनवर हवाई हल्ले केले तेव्हा मात्र हे सेक्यूलर झोपले होते. पाकिस्तानी सेना बलूचिस्तानात नियमितपणे लोकांची हत्या करतेय पण हे या सेक्यूलरांना दिसत नाही तेव्हा यांच्या तोंडून पाकिस्तान विरुद्ध ब्र निघत नाही. भारतातील मानवाधिकारांची चिंता करण्याचा दावा करणार्‍या सेक्यूलर पत्रकारांना, लेखकांना तेव्हा मात्र राग येत नाही जेव्हा पीडित हिंदू असतो. तेव्हा यांचा मानवतावाद कोठे गेलेला असतो?
भारतीय सेक्युलरवाद्यांच्या डोळयावर एक खास प्रकारचा चश्मा चढवलेला आहे. दादरी प्रकरणावरून थयथयाट करणारे सेक्यूलर भारतातील अनेक घटनांबाबत मात्र मुग गिळून गप्प बसलेले आहेत. मागच्या ऑगस्ट महिन्यात सेनेचे जवान वेदमित्र चौधरी याची मेरठजवळ एका विशिष्ठ जमावाने हत्या केली. मार्चमध्ये एका मुस्लिम मुलीबरोबर लग्न केले म्हणून बिहारमधील हाजीपूरमध्ये एका हिंदू तरुणाची निर्घुण हत्या केली गेली. मागच्या वर्षी जूनमध्ये आंध्रप्रदेशातील इलूरजवळ एकाला जमावाने ठार मारले. जूनमध्येच मुंबईतील पश्‍चिम भांडुप परिसरात अशीच जमावाने एकाची हत्या केली. या शिवाय हजारो घटना आहेत की ज्या कधी प्रसिद्धीत आल्या नाहीत. सेक्यूलर माध्यमं आणि या सेक्यूलर लेखकांना या घटना त्यांच्या सेक्यूलर चष्म्यातून दिसत नाहीत का?
भारतीय सेक्यूलरवाद्यांच्या डोळ्यावर एक खास रंगाचाच चष्मा चढलेला नाही तर तो चष्मा अर्धा पाकिस्तानीही आहे. सेक्यूलर नेते अखिलेश यादव यांनी लखनऊमध्ये गुलाम अली यांचा आदर सत्कार केला. अरविंद केजरीवाल यांनीही गुलाम अली यांचा दिल्लीत कार्यक्रम ठरवला. ‘संगीताचा आणि धर्माचा संबंध नाही, संगीताला राष्ट्राच्या सीमा नसतात’ वगैरे वाक्य यांच्या सोयीच्या राजकारणासाठी आहेत हे कोणी दूधखूळाही सांगेल. कारण केजरीवाल आणि अखिलेश यांना ऑस्कर विजेता संगीतकार ए.आर. रहमान याला निमंत्रित करावेसे वाटले नाही. जेव्हा रजा अकादमीच्या फतव्यामुळे १३ सप्टेंबरचा रहमानचा कार्यक्रम रद्द केला गेला तेव्हा या सेक्यूलर लेखकांना इतक्या मोठ्‌या संगीतकाराबद्दल काही देणे घेणे नव्हते का? तेव्हा यांचा बेडगी मानवतावाद कोठे गेला होता? या सेक्यूलर भारतीय लेखक आणि सेक्यूलर मंडळींच्या सेक्यूलर व्याख्येत हिंदू तर सोडाच पण भारतीय राष्ट्रीय विचारांचे मुस्लीमही बसत नाहीत. याशिवाय सलमान रश्दीसारखा भारतीय लेखकही यांना खूपतो. दुसर्‍या एक सेक्यूलर नेत्या ममता बॅनर्जी यांनी गुलाम अली यांना हे सांगून समर्थन दिले की संगीताला सीमा नसते. असे सांगणार्‍या ममता बॅनर्जींना पश्‍चिम बंगालमधील राष्ट्रीय विचारांच्या किती मुस्लीम गायकांना, वादकांना सन्मान दिला? कलेला सीमा नसते असे सांगणार्‍या ममता बॅनर्जी बांग्लादेशी लेखिका तसलीमा नसरीन यांना का विरोध करतात?
एका परदेशी स्तंभलेखकाने म्हंटले आहे की भारतीय सेक्यूलरवाद खरेच पाकिस्तानी आहे. भारतीय सेक्यूलरवाद राष्ट्राला प्रतिकूल आहे. हे या परदेशी स्तंभलेखकाने सांगितले पण भारतातील सेक्यूलर मंडळी मात्र हे मान्य करणार नाहीत. भारतातील अनेक सेक्यूलर वकील आतंकवादी याकूब मेमन याची फाशी रद्द करण्यासाठी न्यायालयात धावले, रात्र-रात्र झटले, मात्र यांना सामान्य भारतीयांच्या मृत्यूदंडाची चिंता वाटली नाही. १९४७ साली आपल्या काही लोकांनी विचार केला की फाळणी करुन देश वेगळा केला तर कायमची शांतता मिळेल, पण तसे झाले नाही. सोनिया-मनमोहनच्या सेक्यूलर सरकार कारगिलप्रकरणात मुशर्रफ यांच्याशी चर्चा करताना काश्मीरचा काही भाग पाकिस्तानला देण्याच्या निर्णयापर्यंत गेले होते. अशा अनेक राष्ट्राच्या दृष्टीने घातक घटना या सेक्यूलर मंडळींना दिसत नव्हत्या.
१ ऑक्टोबर दरम्यान अजुन एक सेक्यूलर लेखिका शोभा डे यांनी ट्वीटरवर टीवटीवाट केला आहे. ‘मी गोमांस खाल्ले आहे. या, मला मारा’. प्रश्‍न हा आहे की, या डे बाईंमध्ये इतर धर्मीयांच्या भावना दुखावणारे वक्तव्य करण्याची हिम्मत आहे का? भारतातील हिंदू आणि राष्ट्रीय विचारांचे लोक सहिष्णू आहेत म्हणूनच इतके बोलण्याची हिम्मत होते. हिम्मत असेल तर पाकिस्तानात जाऊन त्यांच्याबद्दल असे बोलून दाखवा, व्यक्तीस्वतत्र्य सोडाच, तुमचे हाड ही शिल्लक राहणार नाही. अभिनेता अमीर खानने पीके या सिनेमात हिंदूंचे दैवत असलेल्या भगवान शंकराचा अवमान केला, त्यावर काही हिंदूंनी थोडा निषेध व्यक्त केला बस इतकच. त्याची प्रेषित मुहम्मद पैगंबरांची अशी टवाळी करण्याची हिम्मत आहे का? असे अमीर खानने केले तर त्याचे मुंडके शिल्लक राहणार नाही.
पाकिस्तान भारताविरुद्ध छूपेयुद्ध कायमच खेळतोय. सोशल मिडियाच्या माध्यमातून हे छुपे युद्ध कसे चालले आहे याची माहिती भारतीयांना मिळत आहेच. पाकिस्तानने कोणत्याही औपचारिक युद्धाची घोषणा केलेली नाही, पण भारतीय या तथ्याशी चांगलाच परिचित आहे की तो कायम युद्धस्थितीतच आहे. भारतीय सेक्यूलरवाद हा पाकिस्तानच्या इस्लामिकांच्या समर्थनाविना चालूच शकत नाही. भारतीय युवक सेक्यूलरवाद्यांचा हा दुतोंडीपणा ओळखून आहे. भारतीय पत्रकार, लेखक कधी न्यूयॉर्कमध्ये तर कधी दादरीमध्ये जनतेचा सपाटून मार खातात. सोशल मिडियावर यांना दलाल, प्रेस्टिट्‌यूट, बाजारू मिडिया अशा शब्दात संबोधले जाते. कारण ते एखाद्या बंगल्यासाठी, अर्थिक लाभासाठी किंवा अन्य काही लाभासाठी आपला आत्मा विकत आहेत. अशा या लेखक, पत्रकारांची यापेक्षा वाईट काय मानहानी असणार आहे, आणि असल्या लेखकांवर जनता का म्हणून विश्‍वास ठेवेल!

0 comments:

Post a Comment