This is an example of a HTML caption with a link.
Recent Post
•चौफेर : अमर पुराणिक•
कॉंग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांना आता हे समजून घ्यावे लागेल की, त्यांच्याकडून होणार्‍या विरोधाच्या नावावर अशाच नकारात्मक राजकारणाचा सतत परिचय दिला जात राहिला तर सामान्य जनतेत त्यांची प्रतिमा विकास विरोधी पक्ष अशी ठसेल. खरेतर तशी प्रतिमा आधीपासूनच ठसलेली आहे ती आणखीन गडद होत आहे. संसदीय कामकाज न चालणे हे कोणाच्याही हिताचे नाही. संसद नकारात्मक राजकारणाची बंधक बनल्याचे चित्र जनतेसमोर आणखीन प्रखरतेने समोर येत आहे. संसद वाद-विवाद, संवादाबरोबरच निर्णायक कृती करुन देशाचा विकास साधण्यासाठी आहे. माफक वादानंतर योग्य आणि समाधानकारक निर्णय होणे आवश्यक आहे पण कॉंग्रेस आपल्या जबाबदारीपासून पलायन करत आहे.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सुरुवात राज्यघटनेप्रती निष्ठा जपण्याची शपथ घेऊन झाली. संसदेचे सत्र सुरु झाले तेव्हा असे वाटले की आता हे हिवाळी अधिवेशन ठोस कामकाजाने गाजेल. पण या आशेने निराशाच केली. पहिल्यांदा कथित असहिष्णूतेच्या मुद्द्यावर संसदेतील चर्चेत आडकाठी आणली गेली. नंतर काही व्यर्थ मुद्‌यावर विवाद करुन गोंधळ घालण्याची नवी नवी कारणं शोधली गेली. नंतर नॅशनल हॅराल्ड प्रकरणात उच्च न्यायालयाचा निर्णय हा आपल्या विरोधात बदल्याचे राजकारण असल्याचा कांगावा करत संसद ठप्प केली गेली. याबाबत डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी ३ वर्षांपुर्वी कॉग्रेसचे सरकार असताना दाखल केलेला दावा होता. असे असतानाही कॉंग्रेस गदारोळ करतेय. कॉंग्रेसचे जे नेते नॅशनल हॅराल्ड प्रकरणावरुन सरकारवर हल्ले करत आहेत तो निव्वळ त्यांच्या सोनिया, राहुल गांधी भक्ती प्रदर्शनाचा भाग आहे. आणि याचा कहर म्हणजे कॉग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही आरोप केला आहे की, पंतप्रधान  कार्यालयाची यात मुख्य भूमिका आहे. कॉंग्रेस नेत्यांना यातील सत्य माहित आहे की, पंतप्रधान कार्यालयातचा यात संबंध नाही, तरीही न्यायालयीन मुद्द्यावर संसद ठप्प करण्याचा प्रकार कॉंग्रेसने केला आहे. पण जनतेत यातून कॉंग्रेसच्या विरोधा संदेश गेला आहे आणि यात कॉंग्रेसचीच प्रतिमा मलिन होतेय याचमुळे जनतेने कॉंग्रेसला सत्ताच्यूत केलेय हे कॉंग्रेस विसरतेय.
अनेक महत्त्वपुर्ण विधेयके पारित व्हायची थांबली आहेत. यातील सर्वात महत्त्वाचे विधेयक जीएसटी विधेयक. हे विधेयक देशासाठी किती महत्त्वपुर्ण आहे याची जाणिव कॉंगे्रेसला आहे, पण त्यांना राष्ट्रहितापेक्षा सत्ता महत्त्वाची वाटतेय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्राच्या सुरुवातीला संसदेत म्हंटले होते की, संवादातून मार्ग निघतो, लोकशाहीत सहमतीची ताकत खूप मोठी आहे. पण ही सहमती मिळत नसल्यामुळे विधेयके अडली आहेत. या विधेयकांना चांगल्या कायद्याचे मुर्त रुप प्राप्त होताना दिसत नाही. प्रश्‍न हा आहे की कॉंग्रेस कशासाठी अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर राजकारण करत आहे? हे विधेयक लोकसभेत पारित झालेय पण कॉंग्रेस राज्यसभेत पारित होऊ देत नाहीये. हे विधेयक पारित होण्यासाठी भाजपाप्रणित रालोआचे राज्यसभेत दोन तृतियांश बहूमत असणे गरजेचे आहे. सत्तारुढ भाजपाप्रणित रालोआ सरकारकडे राज्यसभेतील एकुण २४०सदस्यांपैकी केवळ ६६ सदस्य आहेत. एकट्‌या कॉंग्रेसचे राज्यसभेत ६८ सदस्य आहेत. भाजपा सरकारला बीजू जनता दलाच्या ६ सदस्यांचा, बसपाच्या १० सदस्यांचा आणि जदयूच्या १२ सदस्यांचा पाठींबा आहे. शिवाय तृणमूल कॉंग्रेसचे १२ सदस्य आणि जयललितांच्या पक्षाच्या १२ सदस्यांचा पाठींबा मिळण्याचेही संकेत आहेत. पण तरीही या विधेयकासाठी दोन तृतियांश बहुमताचा पल्ला गाठता येणार नाही. त्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपुर्वी सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांना चर्चेसाठी बोलावले होते. सुरुवातीला वाटले होते की कॉंग्रेस आता विधेयकात सकारात्मक भूमिका घेईल. पण तसे होताना दिसलेले नाही. कॉंग्रेसने आपला अडेलतट्टूपणा सोडलेला नाही. मनमोहन सिंग यांनी जीएसटीचे समर्थन केले आहे पण इतर कॉंग्रेस नेत्यांचा विरोध कायम आहे.
सोनिया गांधी यांनी मागणी केली आहे की, दारु/मद्याचा समावेश जीएसटी मध्ये करावा. कॉंग्रेस शासित राज्यांची तशी मागणी आहे. कॉंग्रेसला भीती वाटतेय की, जर मद्याचा समावेश जीएसटीत केला नाही तर कर्नाटक आणि केरळ सारख्या राज्यात कॉंग्रेसला नुकसान होईल. तसेच कमाल सेवा कराची मर्यादाही निश्‍चित करण्याची मागणी केली आहे. शिवाय कॉंग्रेस अतिरिक्त लेवी पद्धत बंद करावी अशीही मागणी करतेय. अतिरिक्त लेवीअंतर्गत एका राज्यातून दुसर्‍या राज्यात माल घेऊन गेल्यास १ टक्के कर द्यावा लागतो. हे प्रावधान महाराष्ट्र, गुजरात आणि तामिळनाडू सारख्या औद्योगिक राज्यांच्या मागणीवरुन केलेेले आहे. पण त्यामुळे कॉंग्रेस शासित राज्याचे नुकसान होतेय असा कॉंग्रेसचा युक्तीवाद आहे. म्हणून ती हटवावी अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे. लेवी हटवण्याबाबत मोदी सरकारने सकारात्मक संकेत दिले आहेत. पण मद्याचा समावेश जीएसटीत करण्यास मोदी सरकार तयार नाही. तर कमाल वस्तू सेवा कराची मर्यादा संविधानाद्वारे नक्की करण्यास केंद्र सरकार अनुकुल नाही तर यासाठी वेगळा कायदा करुन त्याची कमाल सीमा निश्‍चित करण्यास केंद्र सरकार अनुकुल आहे. सरकार याबाबत अशी भूमिका घेण्याचे कारण असे आहे की, साधारण कायद्यात गरज पडल्यास योग्य त्या सुधारणा सहजतेने करता येतात, पण संविधानिक संशोधन करणे अतिशय कठीण असते. कॉंग्रेसच्या दोन मागण्या सरकारने नकारल्या आहेत तर एक मागणी मान्य करण्याची तयारी दर्शवली आहे. पण कॉंग्रेस जाणिवपुर्वक मद्याचा समावेश जीएसटीत करण्याबाबत हटवादी भूमिका घेऊन जीएसटी विधेयक याही अधिवेशनात पारित होऊ न देण्याच्या पवित्र्यात आहे.
सध्याच्या स्थितीत राज्यसभेतील बहुमताचा पल्ला गाठणे भाजपाला शक्य नाही. सत्तेत आल्यापासून मोदी सरकारला संसदेचे कामकाज चालवणे अवघड झाले आहे. हे असे कार्य आहे की मोदी सरकारला कोणत्याही परिस्थितीत करावेच लागणार आहे. कारण मोदी सरकार सत्तेत येऊन दिड वर्ष होऊन गेले. भाजपाने देशाच्या उन्नतीसाठी जनतेला जी आश्‍वासने दिली आहेत ती पुर्ण होण्याच्या प्रतिक्षेत देशवासी आहेत. ही आश्‍वासने तेव्हाच पुर्ण होऊ शकतात जेव्हा संसदेचे कामकाज योग्य पद्धतीने चालेल. कॉंग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांना आता हे समजून घ्यावे लागेल की, त्यांच्याकडून होणार्‍या विरोधाच्या नावावर अशाच नकारात्मक राजकारणाचा सतत परिचय दिला जात राहिला तर सामान्य जनतेत त्यांची प्रतिमा विकास विरोधी पक्ष अशी ठसेल. खरेतर तशी प्रतिमा आधीपासूनच ठसलेली आहे ती आणखीन गडद होत आहे. संसदीय कामकाज न चालणे हे कोणाच्याही हिताचे नाही. संसद नकारात्मक राजकारणाची बंधक बनल्याचे चित्र जनतेसमोर आणखीन प्रखरतेने समोर येत आहे. संसद वाद-विवाद, संवादाबरोबरच निर्णायक कृती करुन देशाचा विकास साधण्यासाठी आहे. माफक वादानंतर योग्य आणि समाधानकारक निर्णय होणे आवश्यक आहे पण कॉंग्रेस आपल्या जबाबदारीपासून पलायन करत आहे.
•चौफेर : अमर पुराणिक•
न्यायालयीन कार्यवाही आणि निर्णय सरकारच्या माथी मारण्याचा उद्योग कॉंग्रेसने चालवला आहे. लोकसभेचे आणि राज्यसभेचे कामकाज गोंधळ घालून बंद पाडले गेले. सोनिया गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली कॉंग्रेसचे खासदार संसदेत गोंधळ घालत होते हे उभ्या देशाने पाहिले. नॅशनल हॅराल्ड प्रकरणावरुन सोनिया गांधी यांनी ‘मै इंदिरा गांधी की बहू हूं, किसीसे डरनेवाली नही हूँ’ असे विधान केले. गांधी घराणे सोनिया गांधी, राहूल गांधी हे या राष्ट्रापेक्षा, भारताच्या संविधानापेक्षा मोठे आहे काय? असा प्रश्‍न उपस्थित होतो. 
‘वन मॅन आर्मी’ संबोधले जाणारे ज्येष्ठ भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि कॉंग्रेसच्या तोंडाला अक्षरश: फेस आणला आहे. कॉंग्रेस पक्षात त्यांनी भूकंप आणला आहे. सध्या नॅशनल हॅराल्ड प्रकरणावरुन वादळ उठले आहे. न्यायालयीन कार्यवाही आणि निर्णय सरकारच्या माथी मारण्याचा उद्योग कॉंग्रेसने चालवला आहे. लोकसभेचे आणि राज्यसभेचे कामकाज गोंधळ घालून बंद पाडले गेले. सोनिया गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली कॉंग्रेसचे खासदार संसदेत गोंधळ घालत होते हे उभ्या देशाने पाहिले. नॅशनल हॅराल्ड प्रकरणावरुन सोनिया गांधी यांनी ‘मै इंदिरा गांधी की बहू हूं, किसीसे डरनेवाली नही हूँ’ असे विधान केले. गांधी घराणे सोनिया गांधी, राहूल गांधी हे या राष्ट्रापेक्षा, भारताच्या संविधानापेक्षा मोठे आहे काय? असा प्रश्‍न उपस्थित होतो.
न्यायालयाने केवळ सोनिया गांधी, राहुल गांधी यांना न्यायालयात व्यक्तीश: हजर राहण्याचा समन्स जारी केला आहे. त्यांच्यावर ४२०ची केस असुनही न्यायालयाने फौजदारी वॉरंट काढलेले नाही. फक्त न्यायालयाने न्यायालयात हजर राहण्याची विनंती केली तर सोनिया गांधी, राहुल गांधी यांना झोंबले आणि सोनियाबाई ‘मै इंदिरा गांधी की बहू हूं, किसीसे डरनेवाली नही हूँ’ असे बरळल्या. तर राहुल गांधी यांनी ‘इसका जवाब संसद मे दुंगा’ म्हणाले. ते हे ही म्हणाले की भाजपा सरकार आमच्याशी बदला घेत आहेत. आता यात विचार करण्यासारखी गोष्ट आहे की न्यायालयाला सुब्रमण्यम स्वामी यांच्या या दाव्यात काही तरी तथ्य दिसले असेलच ना, म्हणूनच न्यायालयाने इंदिरा गांधींच्या सुनेला आणि नातवाला न्यायालयात हजर होण्यास सांगितले. आणि दुसरा मुद्दा म्हणजे हा दावा कॉंगे्रसप्रणित संपुआ सरकारच्या काळातच दाखल झाला आहे. हा दावा दाखल होऊन ३-४ वर्षे झाली तेव्हापासून अनेकदा विनंती करुनही सोनिया गांधी, राहुल गांधी न्यायालयात हजर झाले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने समन्स जारी केला तर सोनिया गांधी यांचा तीळपापड झाला त्यांना इतका संताप आला. कोण समजतात हे सोनिया गांधी आणि राहूल गांधी स्वत:ला या देशाचे राजे? की या देशाचे मालक?
नॅशनल हॅराल्ड प्रकरण गेल्या काही दिवसांपासून गाजत आहे. याची थोडी पार्श्‍वभूमी समजाऊन घेणे आवश्यक आहे. नॅशनल हॅराल्ड या वर्तमानपत्राची साधारणपणे ५ हजार कोटी रूपये किमतीची स्थावर जंगम मालमत्ता केवळ ५० लाख रूपयात हडपण्याचा प्रकार सोनिया गांधी, राहुल गांधी, सुमन दुबे, मोतीलाल वोरा, ऑस्कर फर्नांडिस आणि सॅम पित्रोदा यांनी केला.
१९३८ साली नॅशनल हेराल्ड या वर्तमानपत्राची स्थापना झाली. सुरूवातीचा काही काळ जवाहरलाल नेहरु या वर्तमानपत्राचे संपादक होते. नंतरच्या काळात फिरोझ गांधींनीही नॅशनल हेराल्डचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहिले होते. पण नॅशनल हेराल्ड या वर्तमानपत्राची मालकी असोसिएटेड जर्नल प्रायव्हेट लिमिटेड(एजेपीएल)कडे होती. हे वर्तमानपत्र अनेकदा बंद पडले आणि चालू झाले. २००८ साली नॅशनल हेराल्डचे चेअरमन होते कॉंग्रेस पक्षाचे कोषाध्यक्ष मोतीलाल वोरा. स्वातंत्रपुर्वकाळापासूनच नॅशनल हेराल्डला मोफत जमीन, स्वस्त कर्ज आणि अन्य सुविधा मिळत होत्या. हळूहळू या कंपनीची २००० ते ५००० कोटी रूपयांची संपत्ती जमा झाली. यात ऑफिस, मोठमोठ्‌या बिल्डिंग्ज, प्रिंटींग प्रेस आणि अन्य संपत्ती समाविष्ट आहे. नॅशनल हेराल्डने स्वस्त व्याज दराने कर्ज आणि इतर सुविधा वर्तमानपत्र चालवण्याच्या नावाखाली स्वस्तात घेतल्या होत्या. पण नॅशनल हेराल्डने मिळालेल्या जमीनीवर बेकायदेशीररित्या मोठमोठ्‌या इमारती, मॉल्स बांधले, पासपोर्ट ऑफिस, टुरिस्ट ऑफिसेस बनवली. अशा तर्‍हेेने नॅशनल हेराल्डकडे २००० कोटी ते ५००० कोटींची संपत्ती जमा झाली.
२००८ साली या कंपनीने तोटा दाखवून कॉंग्रेस पक्षाकडून ९० कोटी रुपयांचे कर्ज घेतले. राजकीय पक्ष निधीसाठी इतरांच्या देणग्या घेत असतात. पण राजकीय पक्षांना मिळालेला हा पैसा दुसर्‍यांना कर्ज म्हणून देता येत नाही. पण या कायद्याची पायमल्ली करून नॅशनल हेराल्ड(एजेपीएल)ला तब्बल ९० कोटी रूपयांचे कर्ज शून्य व्याजाने दिले. यात लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे कर्ज घेत असताना कर्ज घेणारी कंपनी नॅशनल हॅराल्ड(एजेपीएल)चे चेअरमन होते मोतीलाल वोरा आणि कर्ज देणारी कंपनी म्हणजे कॉंग्रेस पक्ष तेव्हा कॉंग्रेस पक्षाचे कोषाध्यक्ष होते मोतीलाल वोरा. आणि कर्ज घेतल्याबरोबर नॅशनल हॅराल्ड वर्तमान पत्र बंद केले आणि नॅशनल हॅराल्ड(एजेपीएल)ने स्वत:ला दिवाळखोर घोषित केले.
२००८ नंतर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी एक ‘यंग इंडियन’ नावाची नवी कंपनी बनवली. त्यात ७६ टक्के शेयर मायलेकाच्या नावावर होते. म्हणजे  ३८ टक्के शेयर सोनिया गांधी यांचे आणि ३८ टक्के शेयर राहुल गांधी यांचे. या कंपनीचे डायरेक्टर मोतीलाल वोरा आणि ऑस्कर फर्नांडीस यांना बनवले. बाकीच्या २४ टक्के शेयर पैकी १२ टक्के शेयर मोतीलाल वोरा यांच्या नावे व १२ टक्के शेयर ऑस्कर फर्नांडीस यांच्या नावे केले. ‘यंग इंडियन’ कंपनी फक्त ५ लाखाचा खर्च दाखवून सुरु केली गेली होती. लक्षात घ्या, मोतीलाल वोरा कॉंग्रेसचेकोषाध्यक्ष ही होतेे, एजेपीएलचेचेअरमन पण होते आणि यंग इंडियनचे डायरेक्टर सुद्धा झाले. म्हणजे या तीनही कंपन्यात मोतीलाल वोरा महाशय महत्त्वाची भूमिका निभावत होते.
हा व्यवहार समजायला थोडा क्लिष्ट आहे. थोडी पुनरावृत्ती झाली तरी हरकत नाही पण घोटाळा समजण्यासाठी हे समजून घेणे आगत्याचे आहे. २००८ साली नॅशनल हॅराल्ड वर्तमानपत्र बंद झाले होते. नॅशनल हॅराल्ड(एजेपीएल)ची ५ हजार कोटींची संपत्ती पडली असतानही कॉंग्रेसने नॅशनल हॅराल्ड(एजेपीएल)ला ९० कोटींचे कर्ज दिले. सोनिया गांधी यांच्या सांगण्यावरून यंग इंडियन कंपनीचे डायरेक्टर मोतीलाल वोेरा यांनी म्हणजे कांग्रेस कोषाध्यक्ष यांनी स्वत:ला ५० लाख रुपयांची लाच दिली आणि म्हणाले की ९० कोटी रुपयांचे कर्ज आपण नॅशनल हॅराल्ड(एजेपीएल)ला दिले होते, आपल्या कर्जाची परतफेड करु शकत नाही कारण  कंपनी दिवाळखोरीत गेली आहे, त्यामुळे ५० लाख घेऊन ‘मामला रफा दफा कर दो’. नंतर नॅशनल हॅराल्डला कॉंग्रेसने कर्जापोटी दिलेले ९० कोटी रुपये यंग इंडियनच्या नावावर जमा केले.
यात बेकायदेशीर बाब ही आहे की, कॉंग्रेसने पक्षाचा पैसा कर्ज म्हणून देता येत नाही, कारण राजकीय पक्षांना आयकराचा लाभ मिळतो. त्यामुळे पक्षाला मिळालेला निधी हा पक्षाच्या खर्चासाठी मिळतो. तरीही कॉंग्रेसने कर्ज दिले २००८ साली कॉंग्रेस सत्तेत होती सत्तेचा गैरफायदा घेत हा घोटाळा केला गेला. कर्जाची परतफेड करण्यासाठी नॅशनल हॅराल्ड आपली एखादी छोटी प्रॉपर्टी विकून कर्ज फेडू शकली असती पण तसे न करता कॉंग्रेस पक्षाकडून कर्ज घेतले. सुब्रमण्यम स्वामी यांचे म्हणणे हेच आहे की, या लोकांची नीतीमत्ता पहिल्यापासूनच खराब होती म्हणूनच कॉंग्रेसकडून ९० कोटी कर्ज घेताच नॅशनल हॅराल्ड बंद केले गेले. आणि नंतर ९० कोटी रुपये यंग इंडियनच्या नावावर जमा केले गेले. या तीनही कंपनीचे पदाधिकारी हे सोनिया गांधी, राहुल गांधी, मोतीलाल वोरा हे आहेत. त्यांच्या त्यांच्यातच संगनमताने हा गैरव्यवहार झाला असल्याचे स्वामी यांचे म्हणणे आहे. यांनी अशा पद्धतीने नॅशनल हॅराल्ड(एजेपीएल)चे ९९.१ टक्के शेयर यंग इंडियनच्या नावाने करुन घेतले आणि ५००० कोटींची संपत्ती यंग इंडियनच्या नावाने झाली ज्याचे मालक सोनिया गांधी आणि राहुल गांधी आहेत. मालक यासाठीच म्हणायचे की ७६ टक्के शेयर सोनिया गांधी, राहुल गांधींचे आहेत तर प्रत्येकी १२ टक्के शेयर मोतीलाल वोरा आणि ऑस्कर फर्नांडीस यांचे आहेत. ही जमीन आणि मालमत्ता ही नॅशनल हॅराल्ड(एजेपीएल)ने वर्तमान पत्र चालवण्यासाठी घेतली होती आणि तीच मालमत्ता यंन इंडियनने इतरांना भाड्‌याने दिली आहे. दिल्लीच्या बहादुर शहा जफर मार्गावरील ही टोलेजंग इमारत अनेक मल्टी नॅशनल कंपन्यांना आणि परराष्ट्र मंत्रालयालाही भाड्‌याने दिली.
सोशल मिडीयावर सध्या नॅशनल हॅराल्ड(एजेपीएल)चाच धुमाकुळ सुरु आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हंटले आहे की सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी यात चारसोबीसी आणि विश्‍वासघात केला आहे म्हणूनच स्वामी यांनी सगळी माहिती, कागदपत्रे जमा करुन त्यांच्या विरोधात दावा दाखल केला आहे. आता सोनिया गांधी, राहुल गांधी, मोतीलाल वोरा, ऑस्कर फनार्र्ंडीस आणि सॅम पित्रोदा यांनी कितीही थयथयाट केला तरीही त्यांची डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांच्या तावडीतून सुटका होण्याची शक्यता दिसत नाही. कारण आजपर्यंत सत्तेचा गैरवापर करुन ही मंडळी राजरोजपणे फिरते आहे. संसदेत गोंधळ घालून देशाच्या विकासाला खिळ घालू पहाणार्‍या सोनिया गांधी, राहुल गांधींचे हे कृत्य म्हणजे चोराच्या उलट्‌या बोंबा आहेत. आता यानंतर कोर्टांची ट्रायल सुरु होईल तेव्हा सोनिया गांधी, राहुल गांधींची पळता भूई थोडी होणार आहे.
•चौफेर : अमर पुराणिक•
गेल्या वीस वर्षात देशात इतके दहशतवादी हल्ले झाले, बॉम्ब स्फोट झाले, अब्जावधींची भ्रष्टाचारांची प्रकरण उघडकीस आली तेव्हा या अमीर खान, शाहरुख खानाला असुरक्षित वाटले नाही. पण आता मोदी सरकार सत्तेत आल्यापासून देशात अशा घटना घडल्या नाहीत तरी या खानाला अचानकच असुरक्षित वाटू लागते याला काय म्हणावे. प्रेक्षक, जनता दूधखूळी वाटली की काय याला? बिहार निवडणूकीआधीपासून काही सेक्यूलर विचारवंत, लेखकांकडून आणि विशेषत: माध्यमांकडून पद्धतशीरपणे असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु झाला. त्यात आता चित्रपट अभिनेता शाहरुख खान आणि अमीर खानची भर पडली आहे.
अभिनेता अमीर खाननं त्याची बायको किरण रावला भारतात असुरक्षित वाटतयं असं विधान करुन देशात वातावरण भडकवले आहे. देशात असहिष्णूता वाढतेय असं भोंगळ कारण पुढे करत पुरस्कार परत करणार्‍यांचा पुरस्कार वापसीचा अध्याय संपला न संपला तोच या अमीर खानानं याचा दुसरा अध्याय सुरु केला. देशात असहिष्णूता वाढतेय असे काल्पनिक वातावरण निर्माण करत देशात प्रचंड असुरक्षितता असल्याचा भास निर्माण करण्यासाठी हा टुकार अभिनेता अशी विधानं करुन भारतासारख्या सहिष्णू देशात सांस्कृतिक दहशतवाद निर्माण करतोय, भारतीय जनतेला ब्लॅकमेल करतोय. त्यात तथाकथित सेक्यूलर माध्यमं, विचारवंत आणि कॉंग्रेस, डावे व्यक्ती स्वतंत्र्याच्या नावाखाली तेल ओतण्याचं काम करताहेत. या कृत्यालाही अनेक पैलू आहेत. अशी विधानं करण्यापाठीमागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे मोदी सरकार अस्थिर करणे, देशातील शांततेला आणि विकासाला खीळ लावणे आहे.
गेल्या वीस वर्षात देशात इतके दहशतवादी हल्ले झाले, बॉम्ब स्फोट झाले, अब्जावधींची भ्रष्टाचारांची प्रकरण उघडकीस आली तेव्हा या अमीर खान, शाहरुख खानाला असुरक्षित वाटले नाही. पण आता मोदी सरकार सत्तेत आल्यापासून देशात अशा घटना घडल्या नाहीत तरी या खानाला अचानकच असुरक्षित वाटू लागते याला काय म्हणावे. प्रेक्षक, जनता दूधखूळी वाटली की काय याला? बिहार निवडणूकीआधीपासून काही सेक्यूलर विचारवंत, लेखकांकडून आणि विशेषत: माध्यमांकडून पद्धतशीरपणे असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु झाला. त्यात आता चित्रपट अभिनेता शाहरुख खान आणि अमीर खानची भर पडली आहे. काही दिवसांपुर्वी शाहरुख खाननेही अशीच वाह्यात विधानं केली होती. या अमीर खान आणि शाहरुख खानाला या देशातील जनतेने मोठे केले. आफाट पैसा आणि प्रसिद्धी दिली. चाहत्यांनी यांना आपल्या गळ्यातला ताईत बनवलं. हे टुकार अभिनेते याचा अर्थ असा घेत आहेत की यांनी काहीही केलं तरी यांचे चाहते यांना डोक्यावर घेतील. पण अमीर खान, शाहरुख खान विसरत आहेत की, जर देशद्रोही विधानं आणि कृत्यं केली तर जनता यांना पायदळी तुडवून काढल्याशिवाय राहणार नाही. या देशात राहून इथल्या जनतेच्या पैशावर मोठे झालेल्या या बांडगुळांना याच देशातील जनता उखडून फेकायला कमी करणार नाही हे विसरु नये.
आज ज्येष्ठ पत्रकार, ‘सडेतोड’कार कै. अरुण रामतीर्थकर सर आपल्यात नाहीत. अमीर खानचं हे प्रकरण चालू झाल्यापासून रामतीर्थकर सरांची प्रकर्षाने आठवण होतेय. रामतीर्थकर सर जर आज असते तर ‘देश सोडून चालता हो!’ अशा मथळ्याचा ‘सडेतोड’ त्यांनी तरुण भारतमध्ये लिहिला असता. अक्षरश: रामतीर्थकर सरांनी या खानाची पीसं काढली असती. या देशाने यांना इतके मोठे केले. मान, पैसा, प्रेम, प्रसिद्धी दिली. शेवटी हे या देशावरच उलटले. आणि म्हणतोय भारतात असुरक्षित वाटतयं. जर भारतात तशी परिस्थिती असती तर अमीर खान, शाहरुख खान ही नावं देखील कोणाला माहित झाली नसती. आज हे बोलण्याचं धाडस हा करतोय किंवा हे बोलण्याचं स्वातंत्र मिळालय ते मिळालं असतं का?
देशात असहिष्णूता असल्याचा कांगावा करत देशाची बदनामी करण्याचे षडयंत्र पद्धतशीरपणे राबले जातेय. या षडयंत्राच्या माध्यमातून देशात अस्थिरता निर्माण करण्याचे आणि देशाच्या प्रगतीच्या वाटेत काटे पसरवण्याचे काम याच देशातील या सेक्यूलर मंडळींकडून करवून घेतले जातेय. गेल्या दिड वर्षात पंतप्रधान मोदी यांनी घेतलेले राष्ट्रहीताचे निर्णय या बांडगुळांना त्रासाचे वाटताहेत. मुंबईच्या सिनेसृष्टीतील या सेक्यूलरांच्या पाचावर धारण बसण्याचे आणखी एक कारण आहे. देशातील अतिरेकी कारवाया उखडून फेकण्याच्यादृष्टीने सरकार पावले टाकतेय. दाऊद इब्राहिमला पकडण्यासाठी मोदी सरकारकडून फास आवळला जातोय. त्याचा हा परिणाम आहे. या सेक्यूलरवाद्यांना आणि विशेषत: मुंबई चित्रपटसृष्टीतील काही लोकांनी याचा धसका घेतला आहे. मुंबईच्या चित्रपटसृष्टीवर दाऊद इब्राहिमची पकड आहे. येथील काही लोकांचे साम्राज्य दाऊद इब्राहिमच्या पाठींब्यावर उभे आहे. दाऊदची हिंदी चित्रपटसृष्टीवरील पकड सुटू नये, जर दाऊद पकडला गेला तर यांची दुकाने बंद पडतील म्हणून हा अकांडतांडव केला जातोय. जसजसे पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आणि पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल अधिक आक्रमक होतील आणि दाऊदच्या मुसक्या आवळत जातील तसतसे या सिनेसृष्टीतील काही सेक्यूलरांचा थयथयाट वाढत जाणार आहे.
या देशातील जनतेने यांना इतके प्रेम दिले, पैसा दिला, पण हे अमीर खान, शाहरुख खान कधीही कोणत्या सामाजिक कामात योगदान देताना दिसलेले नाहीत. या देशातील जनतेच्या जीवावर मिळालेल्या पैशावर हे लोक इतकी माजोरी भाषा बोलताहेत. महाराष्ट्रात शेतकर्‍यांनी इतक्या आत्महत्या केल्या तेव्हा यांना सहिष्णूतेची जाणिव झाली नाही. अभिनेता अक्षय कुमारने आत्तापर्यंत जवळजवळ एक कोटी रुपयांपेक्षा जास्त आर्थिक मदत आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांना दिली आहे. तेही कोणताही गवगवा न करता. अजुनही मदत करतोच आहे. पण प्रसारमाध्यमांना या बातमीला प्रसिद्धी द्यावीशी वाटली नाही. पण हा अमीर खान ‘सत्यमेव जयते’ कार्यक्रमातून कोट्‌यवधी रुपये घेऊन लोकांना शहाणपणाचे उपदेश देतोय. पण कोणत्याही सामाजिक समस्येत, राष्ट्रीय समस्येत या अमीर खानने कवडीची मदत केली नाही. उलट कोट्यवधी रुपये खिशात घालून फुशारकी मारतोय. जेव्हा देशात दहशतवादी हल्ले झाले, शेकडो लोक मारले गेले, नैसर्गिक दुर्घटना घडल्या तेव्हा यांची सहिष्णूता कोठे वाळुत तोंड खुपसून बसली होती. देशाच्या सीमेवर भारतीय जवानांचे मुडदे पडत होते तेव्हा यांना असहिष्णूता वाटली नाही का?
अशा संधीसाधू आणि देशप्रेमाचा लवलेश नसलेल्या अभिनेत्यांना त्यांची जागा जनता दाखवेलच दाखवेल. सोशल मिडीयात अमीर खानच्या विकृत विधानावरुन तुफान वादळ उठलेय. अमीर खान आणि शाहरुख खानवर प्रचंड टीकेची झोड उठली आहे. यांचे चित्रपट पाहू नये, त्यांनी केलेल्या जाहिरातींची उत्पादने घेऊ नये अशी आवाहनं करणारी, विनंती करणारे पोस्ट फिरताहेत, केवळ फिरतच नाहीत तर अशा पोस्टचा अक्षरश: पूर आलाय. अमीर खान ब्रँड अम्बॅसीडर असलेल्या स्नॅपडील या कंपनीला याचा खूप मोठा फटका बसला आहे. स्नॅपडीलचं ऍप धडाधड अनइनस्टॉल केले जात आहे. या शिवाय अमीर खानने जाहिराती केलेल्या इतर कंपन्यांनाही याचा फटका बसला आहे.
गेल्या पंधरा-वीस वर्षात जेव्हा एखादा मोठ्‌या बजेटचा चित्रपट प्रदर्शित होणार असतो तेव्हा चित्रपटाचे प्रमोशन केले जाते. त्याचबरोबर अशी वादग्रस्त विधानं करुन चित्रपटाची हवा निर्माण करण्याची कुप्रथा पडली आहे. टूकार चित्रपट काढून असला गदारोळ माजवून गल्ला जमवला जातो. हा ट्रेंड घातक आहे. अमीर खान, शाहरुख खान यांचे चित्रपट गुणवत्तेच्या जोरावर आणि स्वत:च्या बळावर, अभिनयाच्या बळावर कधीच चाललेले नाहीत. परफेक्शनिस्ट हे अमीर खानचे नामाभिधान माध्यमातील काही टूकार दलालांनी दिलेले आणि स्वयंघोषित आहे. हा लेकाचा इंग्रजी किंवा विदेशी चित्रपटांच्या कथा चोरून ऑस्कर पुरस्कार मागायला निघालाय. अन्यथा अशा टुकार अभिनेत्यांना आपले चित्रपट चालावे म्हणून स्टंटबाजी करण्याची गरज पडली नसती. लवकरच अमीर खानचा ‘दंगल’ आणि शाहरुख खानचा ‘दिलवाले’ प्रदर्शित होतोय. हे चित्रपट चालावे हाही या वादातून परभारे लाभ उठवण्याचा प्रयत्न आहे. भले देशात अराजकता निर्माण झाली तरी चालेल पण यांचा गल्ला जमला पाहिजे. कोणताही चित्रपट प्रदर्शित होण्याआधी असली वाह्यात विधाने करुन चित्रपटाकडे लोकांना आकर्षित करण्याचा धंदा झाला आहे.
आजची परिस्थिती पाहता आता असले उद्योग बंद होतील अशी आशा आहे. जनतेला आता पडद्यामागील स्थिती कळत आहे. यांना जनताच धडा शिकवेल. आता वाद्रग्रस्त विधानं करुन, वादळ उठवून नंतर माफी मागेल. जनताही विसरुन जाईल. आजपर्यंत असेच झाले आहे पण यावेळी मात्र या अमीर खान आणि शाहरुख खान यांनी कितीही याचना केली, माफी मागितली तरीही प्रेक्षक त्यांना माफ करणार नाहीत. अशी देशविधातक विधाने करणार्‍या लोकांचे चित्रपट जनता  पाहणार नाही. अशांचे चित्रपट जनतेच्या पैशावर चालतात. अशा विकृतांचे सिनेमे न पाहता लोक जोरदार झटका देणार अशी स्थिती आहे. आता कितीही माफी मागीतली तरी जनता क्षमा करणार नाही.
•चौफेर : अमर पुराणिक•
मणीशंकर अय्यर आणि सलमान खुर्शिद यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन भारताविरोधात गरळ ओकली आहे. पाकिस्तानमधील वृत्तवाहिनीवर बोलताना मणीशंकर अय्यर यांनी पाकिस्तानकडे याचना केली, अक्षरश: भीक मागितली आहे की, पाकिस्तानने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हटवावे. भारतीय जनतेने बहुमताने निवडलेले सरकार हटवण्याची मागणी भारताच्या विरोधी पक्षाचा नेता, कॉंग्रेसचा नेता पाकिस्तानकडे करतो यातच यांच्या राष्ट्रद्रोही वृत्तीचे पुरावे आले.
नुकतेच बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. त्याचा आनंद जदयु-राजद आणि महागठबंधनातील इतर पक्षांना नेत्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना झाला आणि त्यांना आनंद होणे स्वाभाविक ही आहे. पण, बिहारमधील विजेत्या पक्षाला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना झाला नसेल इतका आनंद पाकिस्तानला झाला. पाकिस्तानला आनंद होण्याचे कारण लालूप्रसाद यादव-नीतिश कुमार हे विजयी झाले यापेक्षा भाजपा पराभूत झाल्याचा हा असूरी आनंद होता. पाकिस्तानमध्ये या विजयाचा आनंदोत्सव बिहारपेक्षा मोठ्‌याप्रमाणावर साजरा केला गेला.
पाकिस्तानला भाजपा पराभूत झाला, मोदींना पराभव पहावा लागला याचा इतका हर्षवायू झाला की, पाकिस्तानला त्यांच्या परराष्ट्र धोरणाचेही भान राहिले नाही. आंतरराष्ट्रीय समुदायासमोर यामुळे पाकिस्तानची भारताबद्दल आणि विशेषत:  पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपा सरकारबद्दलची नेमकी भूमिका आणि मानसिकता आपोआपच मांडली गेली. पाकिस्तानला मोदी यांच्या नेतृत्वातील उभरता भारत पाहायचा नाहीये. त्यांना भारतात कॉंग्रेसच्या नेतृत्वातील पाकधार्जिणे सरकार हवे आहे. दहशतवादाला खतपाणी घालणार्‍या पाकिस्तानच्या तोंडाला मोदींच्या खंबीर नेतृत्वाला तोंड देताना अक्षरश: फेस येत आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून पाकिस्तानला अशा बिकट परिस्थितीचा सामना करण्याची बहूदा पहिल्यांदाच वेळ आली आहे. भारतात मोदींचे भाजपा सरकार नकोय असे पाकिस्तानला जसे वाटतेय तसेच भारतातील सेक्यूलरवाद्यांनाही वाटतेय. विरोधी पक्षांना तर हे वाटणे स्वाभाविकच आहे. पण विशेषत: कॉंग्रेस, डावे आणि नीतिश कुमार, लालूप्रसाद यादव, मुलायमसिंह यादव यांना सत्तेची प्रचंड लालसा लागली आहे. त्यासाठी ते पाकिस्तानचीही मदत घेताहेत. हे सत्तालोलूप विरोधक आणि सेक्यूलरवाद्यांना सत्ता उपभोगायची आहे, त्यांना सत्तासुंदरीचा विरह ५ वर्षेही सहन होईना. मग त्यासाठी देश गहाण ठेवण्याचीही त्यांची तयारी आहे. बिहारच्या जनतेला हे कळले नाही हे या देशाचे दुर्दैव म्हणावे लागेल.
गेल्या अनेक दशकांपासून भाजपाला सत्ता मिळू नये म्हणून निकराचे प्रयत्न झाले आहेत. भाजपाचा, नरेंद्र मोदींचा पराभव व्हावा म्हणून आंतरराष्ट्रीय स्थरावरुन मोठे प्रयत्न झालेत, होताहेत. भाजपाची सत्ता उलथून टाकण्यासाठी सर्वप्रकारचे प्रयत्न विदेशातून होताहेत. त्याला या देशातील कॉंग्रेसचे नेते, डावे आणि सेक्यूलर मंडळी साथ देताहेत. त्यासाठी या सेक्युलर मंडळींची पाकिस्तानचे मांडलिकत्व स्विकारण्याचीही तयारी आहे. पाकिस्तान, ख्रिश्‍चन मिशनर्‍या आणि बर्‍याच स्वयंसेवी संस्था अनेक दशकांपासून हाच प्रयत्न करताहेत. पाकिस्तानने भारतातील काही माध्यमांना हाताशी धरून दशकानुदशक हा अघोरी सारिपाट मांडला आहे. राजदीप सरदेसाई, बरखा दत्तसारखे माध्यमातील काही प्रेस्टीट्यूट वृत्तीचे लोक स्वार्थासाठी देशविघातक कृत्यं करत आहेत.
भारतातील प्रत्येक घटनेवर पाकिस्तानचे बारिक लक्ष असते. पाकिस्तानच्या गुप्तहेर संस्था भारतातील असल्या सेक्यूलर बांडगुळांचा सर्रास वापर करत असते. बिहार निवडणुकांचे वेध लागल्यानंतर अचानक भारतात असहिष्णूता फोफावल्याचा साक्षात्कार या सेक्यूलर विचारवंतांना झाला. आणि त्यांनी एका पाठोपाठ एक पुरस्कार वापसी सुरु केली. सतत भाजपा आणि मोदी सरकारविरोधात वाट्टेल तशी विधाने करणे सुरु केले आणि माध्यमांनी ती विधाने मसाला लावून भडकपणे दाखवली. आता बिहारच्या निवडणुका संपल्यापासून हे सेक्यूलर विचारवंत कुठल्या बिळात लपून बसले आहेत. की बिहारच्या निवडणुका संपल्यानंतर एकदमच भारतातील असहिष्णूता संपली आहे? बिहारमध्ये भाजपाची सत्ता येऊ नये म्हणून या सेक्युलर विचारवंतांनी असहिष्णुतेची अवई उठवली होती. पाकिस्तानलाही बिहारमध्ये भाजपाचे सरकार येऊ नये असे वाटत होते हे त्यांनी भाजपाचा पराभव साजरा केला यावरून दिसून येतेच ना! सेक्यूलर विचारवंतांना मोदी सरकारचा राग येण्याचे दुसरे एक कारण असावे. ते म्हणजे मोदींनी विदेशी एनजीओकडून येणार्‍या पैशावर चाप लावला आहे. त्यामुळे यांचे चोचले थांबले आहेत हाही राग असावा.
मूळात केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार आल्यापासून पाकिस्तानच्या पाचावर धारण बसली आहे. मोदींनी पाकिस्तानच्या मुसक्या राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय स्थरावर आवळायला सुरुवात केली आहे. पण लोकसभेत भाजपाकडे बहूमत असले तरी राज्यसभेत भाजपाचे बहूमत नाही. आणि जर भाजपाने बिहारच्या निवडणुका जिंकल्या असत्या तर भाजपा राज्यसभेतही बहुमताजवळ पोहाचली असती आणि जर भाजपा राज्यसभेत बहुमताजवळ पोहोचली असती तर मग भाजपा अनेक राष्ट्रहीताचे निर्णय कोणत्याही अडथळ्याविना घेऊ शकली असती. मोदी सरकारने आता घेतलेला विकासाचा वेग चौपटीने वाढला असता. मग पाकिस्तानची पळता भूई थोडी झाली असती. याच भीतीतून पाकिस्तानने भारतातील या व्हाईट कॉलर्ड सेक्युलर दलालांकरवी खेळी सुरु केली आणि बिहारची जनता या खेळीत फसली आणि देशाचे प्रचंड मोठे नुकसान करुन गेली.
नीतिश कुमारांच्या विजयोत्सवात सामिल झालेली मंडळी पाहिली की अनेक बाबीचा उलगडा होतो. नीतिश कुमारांना शुभेच्छा द्यायला बरखा दत्त स्वत: बिहारला गेल्या होत्या इतकेच नाही तर नीतिश कुमारांना शुभेच्छा देतानाचा फोटोही ट्वीटरवर टाकला होता. पुरस्कार वापसीतील बरीच मंडळी या विजयाने आनंदून गेली आहेत. असहिष्णूतेचा दंभ खास बिहार निवडणुकीसाठीच राबला गेला की काय? ही शंका आता खरी ठरली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्यावेळीही असेच प्रकार घडले. ही सर्व सेक्यूलर मंडळी आम आदमी पार्टीच्या पाठीशी उभी राहिली. अरविंद केजरीवाल यांनीही त्यावेळी पाकिस्तानची हाजी-हाजी केली होती. त्याचीच पुनरावृत्ती बिहारमध्ये घडली. अशा सेक्यूलरांच्या पाठींब्यामुळे आणि भारतविरोधी राष्ट्राच्या मदतीने भारताच्या विकासात अडथळा आणून पाकधार्जिणे सरकार भारतात आणण्याचा प्रयत्न होतोय. आता बिहारमध्ये सत्ता मिळाल्यानंतर नीतिश कुमारांना पंतप्रधानपदाचे डोहाळे लागले आहेत. तेही याच जोरावर लागलेले असावेत.
याचा आणखीन एक लख्ख पुरावा म्हणजे काही दिवसांपुर्वी कॉंग्रेस नेते मणीशंकर अय्यर आणि सलमान खुर्शिद यांनी केलेली विधाने. मणीशंकर अय्यर आणि सलमान खुर्शिद यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन भारताविरोधात गरळ ओकली आहे. पाकिस्तानमधील वृत्तवाहिनीवर बोलताना मणीशंकर अय्यर यांनी पाकिस्तानकडे याचना केली, अक्षरश: भीक मागितली आहे की, पाकिस्तानने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हटवावे. भारतीय जनतेने बहुमताने निवडलेले सरकार हटवण्याची मागणी भारताच्या विरोधी पक्षाचा नेता, कॉंग्रेसचा नेता पाकिस्तानकडे करतो यातच यांच्या राष्ट्रद्रोही वृत्तीचे पुरावे आले. याच कार्यक्रमात पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेज मुशर्रफ ही होते. त्यांनी मणीशंकर अय्यर यांच्या विधानावर नापसंती व्यक्त करत पुढच्या निवडणुकीपर्यंत वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही असा जोडा हाणला. याचा अर्थ असा होतो की, भारतात भारतीय नागरिकांनी लोकशाही मार्गाने निवडलेले सरकार हटवण्याची मागणी पाकिस्तानकडे करणे म्हणजे या देशातील प्रत्येक नागरिकाचा अपमान आहे. या कॉंग्रेस नेत्यांना आणि सेक्यूलरांना या सरकारला काम करण्यासाठी पाच वर्षाचा कालावधी देण्याचीही इच्छा नाही. इतकी सत्तापिपासा या कॉंग्रेस नेत्यांना लागली आहे.
मणीशंकर अय्यर, सलमान खुर्शिद यांची विधाने, बिहारमधल्या भाजपाच्या पराभवाचा पाकिस्तानातील विजयोत्सव आणि प्रसारमाध्यमातील बरखा दत्त, राजदीप सरदेसाई यांच्यासारख्या माध्यमातील लोकांची आणि सेक्युलर विचारवंताची भूमिका पाहिल्यानंतर संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी मागे काही महिन्यांपुर्वी केलेले एक विधान आठवते की, भारताच्या डीप असेटस पाकिस्तान, चीनमध्ये  नाहीत. पण पाकिस्तानच्या डीप असेटस भारतात प्रचंड मोठ्‌याप्रमाणात आहेत. पाकिस्तानसह इतर शत्रु राष्ट्रांनी जहाल अतिरेक्यांपासून ते व्हाईट कॉलर्ड विचारवंतांपर्यंत डीप असेटस भारतात पेरलेले आहेत. पाकधार्जिणी काही मंडळी, पुरस्कार वापसीवाले सेक्यूलर विचारवंत, माध्यमातील काही लोक, कॉंग्रेस, डावे यांसारखे पक्ष पाकिस्तानी डीपअसेटसचे भाग असावेत? यासाठीच आता संपुर्ण भारतीय जनतेने हे समजून सावध वागण्याची वेळ आली आहे.
•चौफेर : अमर पुराणिक•
राष्ट्रीय स्थरावर मोदींच्या करिश्म्यावर निवडणूका भाजपा सहज जिंकेल पण स्थानिक स्थरावर भाजपा कमकुवत आहे. भाजपाला आता स्थानिक स्थरावर पक्षबांधणीकडे लक्ष देण्याशिवाय पर्याय नाही. लोकसभा निवडणूका जिंकल्यानंतर भाजपाकडून स्थानिक स्थरावर पक्षबांधणीच्यादृष्टीने प्रयत्न होताना दिसले नाहीत. आता बिहारच्या निकालानंतर भाजपाला पक्षबांधणीचा विचार करणे अपरिहार्य आहे. कारण कोणत्याही पक्षाचे खरे बळ हे स्थानिकबळावर अवलंबून असते.
नुकतेच बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. लालूप्रसाद यादव, नीतिश कुमार यांच्या महागठबंधनने निर्विवाद बहूमत मिळवले. भाजपाचा पराभव झाला. अनेकजण आपापल्यापरिने निकालाचे विश्‍लेषण मांडत आहेत. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने चांगले काम करुनही भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला. भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले लालूप्रसाद यादव यांनी या निवडणुकीत नीतिश कुमारांना मागे टाकत सर्वाधिक जागा जिंकल्या. हे बिहारसह बिहार बाहेरील जनतेला आश्‍चर्यकारक वाटले. याचे एक प्रमुख कारण म्हणजे विकासाच्या राजकारणावर जातीच्या राजकारणाने मात केली हे आहे. याशिवायही अनेक पैलू आहेतच. हा पराभव भाजपाचा आहे की बिहारच्या जनतेचा हा मात्र खूप चिंताजनक प्रश्‍न आहे.
आजपर्यंत बिहार अतिशय मागासलेला राहिला आहे. या निकालानंतर बिहारच्या जनतेला भाजपाचे विकासाचे राजकारण समजू शकले नाही का? असा प्रश्‍न निर्माण होतो.  बिहारमधील वस्तूस्थिती अशी आहे की, बिहारमध्ये उद्योगधंदे नाहीत. वैद्यकिय सेवा उपलब्ध नाहीत. बिहारी जनतेला प्राथमिक सुविधाही मिळत नाहीत. त्यामुळे बिहारी लोक इतर राज्यात पलायन करतात. उपजीविकेसाठी विकसित राज्यात जाण्याला त्यांच्यासमोर पर्याय नाही. आजपर्यंत बिहार अविकसित राहिल्यानेच इतर विकसित राज्यांसह महाराष्ट्रात बिहारींचे लोंढे येऊ लागले. याला बिहार राज्य सरकारच जबाबदार आहे. आजपर्यंत लालूप्रसाद यादव आणि नीतिश कुमार यांनी प्रदीर्घकाळ बिहारची सत्ता चालवली आहे. आजपर्यंत मागास राहिलेल्या बिहारची सत्ता आता पुन्हा बिहारच्या जनतेने लालूप्रसाद आणि नीतिश कुमार यांनाच सोपवली आहे. सोशलमिडियात आता पुन्हा महाराष्ट्रात बिहारींचे लोंढे येण्याचे प्रमाण वाढणार असल्याच्या व्यंगात्मक पोस्ट फिरु लागल्या आहेत. याचा अर्थ बिहारच्या जनतेला विकास नकोय असा होत नाही. पण अशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या मागास राहिलेल्या बिहारच्या जनतेला पटवण्यात लालूप्रसाद यादव आणि नीतिश कुमार यशस्वी झाले आहेत आणि भाजपा अयशस्वी ठरली आहे.
विकासाच्या राजकारणापेक्षा बिहारमध्ये आजपर्यंत जातीचे राजकारणच प्रभावी ठरले आहे. जातीगत व्यूहरचना करण्यात भाजपा अपयशी ठरली आहे. लालूप्रसाद यादव आणि नीतिश कुमार यांनी भाजपा सत्तेत आली तर तुमचे आरक्षण काढून घेईल अशा प्रकारची भीती दाखवत सर्व मागास जातींना एकत्रितपणे आपल्याकडे खेचण्यात यशस्वी ठरले आहेत. याशिवाय यादवांसह इतर उच्चवर्गियांनीही लालूप्रसाद यादव आणि नीतिश कुमार यांनाच झुकते माप दिले आहे. या निवडणूकीत भाजपा न मागासवर्गीयांची मते मिळवू शकला ना उच्चवर्गीयांची. या शिवाय सर्वात प्रभावी ठरणारे मुस्लिम गठ्ठा मतदान लालूप्रसाद यादव, नीतिश कुमार आणि कॉंग्रेस यांच्याच पदरात पडले. बिहारमध्ये सर्वात जास्त मतदान मुस्लिम मतदारांचे आहे. त्यामुळे भाजपाला नेहमीप्रमाणे केवळ मागासवर्गीय आणि उच्चवर्गीय मते मिळणे अपेक्षित होते. पण भाजपाला ही मते आपल्याकडे खेचता आली नाहीत. जितनराम मांझी, कुशवाह आणि रामविलास पासवान हे तिघेही निष्प्रभ ठरले. या तीनही दलित नेत्यांचा भाजपाला काडीचाही फायदा झाला नाही. हे भाजपाचे सर्वात मोठे अपयश म्हणावे लागेल. याशिवाय स्थानिक भाजपा नेत्यांचा प्रभाव निवडणुकीत दिसला नाही. काही अभ्यासकांनी भाजपाच्या स्थानिक नेत्यांना बिल्कूलच बळ नसल्याचे मत मांडले आहे शिवाय हे स्थानिक नेते संघटीतपणे लढले नाहीत त्यासाठी निकराचे प्रयत्न स्थानिक नेत्यांकडून झाले नाहीत. स्थानिक नेत्यांच्या हेव्यादाव्यांचा फटका भाजपाला बसला आहे. भाजपाकडे बिहारमध्ये राज्यस्थरावर प्रभाव असलेला लोकनेता नाही हे अधोरेखित झाले आहे.
मुळात बिहारची सामाजिक स्थितीच अशी आहे की, बिहार राज्य हे इतर राज्यांच्या तुलनेत अजूनही वीस ते तीस दशके मागे आहे. इतर सुशिक्षित राज्यांच्या तुलनेत अशिक्षित आणि जंगलराज असलेल्या बिहारची निवडणूक लढताना भाजपाला वेगळी रणनीती आखणे आवश्यक होते. कारण लोकसभेच्या निवडणूका वेगळया पद्धतीने लढल्या जातात, विधानसभेच्या वेगळ्या तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका त्याहून वेगळया मुद्द्यांवर होत असतात. मतदारही लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक निवडणूका वेगवेगळे पैलू समोर ठेऊन मतदान करत असतो. विधानसभा आणि स्थानिक निवडणूका जिंकण्यासाठी स्थानिक उमेदवार आणि कार्यकर्त्यांचे मजबूत बळ असणे आवश्यक आहे. याचीच कमतरता भाजपाकडे आहे, हे भाजपाला मान्य करावे लागेल. कारण माध्यमांनी बिहारची हार ही मोदींची हार असल्याचे मत मांडण्याचा सपाटा लावला आहे. हा वेडगळपणाच आहे. स्थानिक निवडणूकींच्या जय पराजयला पक्षाचे स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांचे बळ कारणीभूत ठरत असते हे माध्यमातील टीकाकार मोदींवर टीका करताना विसरत आहेत.
या निकालानंतर आता बिहार येत्या पाच वर्षात आणखी पाच-दहा वर्षे मागे जाणार आहे. गेली वीसएक वर्षे लालूप्रसाद यादव आणि नीतिश कुमार यांचं सरकार पाहिलं आहे. या वीस वर्षांत विकासाची वाणवाच होती. बिहारचं जंगलराज जगप्रसिद्ध आहेच. आता पुन्हा लालूप्रसाद यादव आणि नीतिश कुमार यांच्या हातात सत्ता गेल्यामुळे यापेक्षा वेगळे काही अपेक्षित असणे शक्य नाही. अर्थात लालूप्रसाद यादव, नीतिश कुमार आणि कॉंग्रेस हे तिघेही किती समन्वयाने सरकार चलवतात हा प्रश्‍न आहेच. हे तिघेही विकासापेक्षा एकमेकांवर कुरघोडी करण्याच दंग राहणार आहेत. त्याशिवाय कायदा आणि सुव्यवस्थेचा नेहमीप्रमाणे बोर्‍या वाजणार आहेच.
बिहारच्या या निकालामुळे केंद्र सरकारसमोरील संसद सुरळीत चालवण्याची समस्या कायम राहिली आहे. राज्यसभेतील भाजपाचे संख्याबळ या निवडणुकीमुळे वाढलेले नाही त्यामुळे संसदेच्या कामकाजात अडथळा यापुढेही राहणारच आहे. विकासाच्यादृष्टीने हे घातक ठरणार आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात काही चांगले निर्णय होतील याची अपेक्षा आता ठेवता येणार नाही तर केवळ गदारोळच होणार हे नक्कीच आहे. यासाठी केंद्र सरकारला वेगळा मार्ग शोधावा लागणार आहे.
राष्ट्रीय स्थरावर मोदींच्या करिश्म्यावर निवडणूका भाजपा सहज जिंकेल पण स्थानिक स्थरावर भाजपा कमकुवत आहे. भाजपाला आता स्थानिक स्थरावर पक्षबांधणीकडे लक्ष देण्याशिवाय पर्याय नाही. लोकसभा निवडणूका जिंकल्यानंतर भाजपाकडून स्थानिक स्थरावर पक्षबांधणीच्यादृष्टीने प्रयत्न होताना दिसले नाहीत. आता बिहारच्या निकालानंतर भाजपाला पक्षबांधणीचा विचार करणे अपरिहार्य आहे. कारण कोणत्याही पक्षाचे खरे बळ हे स्थानिकबळावर अवलंबून असते. शहरा-शहरात गावा-गावांत पक्ष बळकट केला तरच भाजपाला भविष्यात चांगले दिवस दिसणार आहेत. मोदींच्या मॅजिकवर लोकसभेच्या निवडणूका जिंकता येतील पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जिंकता येणार नाहीत याची खूणगाठ भाजपाने कायमची बांधून ठेवावी. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी ‘पार्लमेंट से पंचायत तक’चा मानस व्यक्त केला आहे. पण हे पक्ष संघटनेच्या बळाशिवाय केवळ अशक्य आहे. भाजपाने संघटना बळकट केली तर हे सहज शक्य आहे. कारण जनमानस भाजपाच्या बाजूनेच आहे. पण पक्षसंघटना बळकट नसल्यामुळे स्थानिक पातळीवर जनमानस सोबत असतानाही भाजपा कमकुवत ठरतो. बिहारची हार याचाही परिणाम आहे. भाजपा जर संघटनात्मकदृष्ट्या बळकट झाला तर भाजपाला तोड नाही. आणि त्याचा फायदा देशाच्या बांधणीला आणि देशाच्या विकासाला होणार आहे.
•चौफेर : अमर पुराणिक•
पाकिस्तानमध्ये येऊ घालणार्‍या भयानक स्थितीची जाणीव बहुदा पाकिस्तानी माध्यमांना झाली आहे. काही आंतरराष्ट्रीय अभ्यासकांनी पाकिस्तानचे तुकडे होण्याची शक्यताही वर्तवली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणाकडे पाकिस्तानी माध्यमं अतिशय गंभीरपणे पहात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी गेल्या काही महिन्यात केलेली विधाने आणि कृती पाहता देशवासियांना खात्री झाली आहे की, आता पाकिस्तानची खैर नाही.
पाकिस्तानची स्थिती गेल्या काही दिवसांपासून खूपच वाईट झाली आहे. भारताशी वैरभाव पोसता पोसता आता पाकिस्तानला देशांतर्गत स्थिती सांभाळणे अशक्य होऊन बसले आहे. पाकिस्तानने आजपर्यत भारताशी तीन युद्धं केली. पण प्रत्येकवेळी पाकिस्तानला दारुन पराभव स्विकारावा लागला. तरीही भारतद्वेशाचा कंडू काही कमी होताना दिसत नाही. काश्मीर मिळवण्यासाठी पाकिस्तान भारताशी सतत युद्धाच्या पवित्र्यातच राहीला. काश्मीर मिळणे तर लांबच पण आता पाकिस्तानला देशांतर्गत स्थिती सांभाळणे अशक्य झाले आहे. पाकिस्तानच्या जन्मापासूनच पाकने काश्मीरचा राग आळवणे सुरु केले. तशात तेव्हाचे भारताचे निष्क्रीय परराष्ट्र धोरण पाकच्या पथ्यावर पडले. आज अर्धशतक उलटले तरीही पाकिस्तानची काश्मीर मिळवण्याची मनिषा काही पुर्ण होताना दिसत नाहिये. उलट केंद्रात मोदी सरकार आल्यापासून भारताच्या प्रभावी परराष्ट्र धोरणामुळे पाकिस्तानची त्रेधातिरपीट उडाली आहे. अक्षरश: पाकिस्तानवर ‘भीक नको पण कुत्रे आवर’ म्हणण्याची वेळ येणार आहे. कारण गेल्या वर्षापासून पाकिस्तानची अंतर्गत व्यवस्था पुर्णपणे ढासळली आहे. पाकिस्तानला एकाचवेळी अनेक आघाड्‌या सांभाळणे अशक्य झाले आहे.
भारताशी तीन युद्धं करुन पाकिस्तानने हे जाणले की थेट युद्धात आपण भारताशी टक्कर देऊ शकत नाही. तेव्हापासून पाकिस्तानने दहशतवादाचा आश्रय घेतला. भारतात अतिरेकी पाठवून सतत भारतात दहशतवादी कारस्थाने सुरु ठेवली. गेल्या २५ वर्षांत भारताला या दहशतवादी कारवायांचा सामना करावा लागला. पाकिस्तानला जे युद्ध करुन साध्य करता आले नाही ते पाकिस्तानने जिहादच्या नावाखाली भारतभर इस्लामिक दहशतवाद पसरवून साध्य करण्याचा प्रयत्न केला. भारताचे यात खूप नुकसान झाले, अनेक नागरिकांचे जीव गेले. पण तत्कालिन सरकारने निषेध करण्यापलिकडे कोणतीही ठोस उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे पाकिस्तानला आणखी चेव चढला. पण भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकार सत्तेत आल्यापासून गेल्या वर्षभरात पाकिस्तानला विपरित परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. आजपर्यंतच्या भारताच्या निष्क्रीय परराष्ट्रधोरणामुळेे पाकिस्तानला आपण बलवान असल्याचा भास होत होता. पण मोदी सरकार सत्तेत आल्यापासून पाकिस्तानला वस्तुस्थितीची जाणीव होऊ लागली आहे. काश्मीर मागणे तर सोडाच पण बलूचिस्तान, पाकव्याप्त काश्मीर, पंजाब(पाक) सांभाळणे मुश्किल झाले आहे. आंतरराष्ट्रीय समुदायासमोर याचना करावी लागत आहे. युनोमध्ये पाकिस्तानला आपले तोंड काळे करण्याची पाळी आली आहे.
हे सर्व घडतेय ते आजपर्यंत पाकिस्तानने घेतलेल्या भूमिकेमुळे. पाकिस्तानने  अतिरेकी संघटनांच्या माध्यमातून भारताशी छेडलेले छुपे युद्ध आता पाकिस्तानच्या अंगाशी आले आहे. अल कायदा, लष्कर ए तोयबासारख्या अनेक दहशतवादी संघटना आता पाकिस्तानलाच जड जात आहेत. काश्मीरमध्ये सतत हल्ले करुन  काश्मीरतर बळकावता आला नाही पण आता काश्मीरमधले नागरिकच पाकिस्तानविरोधात उघड उघड आंदोलने करु लागले आहेत. आजपर्यंत धर्माच्या नावाखाली, जिहादच्या नावाखाली तेथील नागरिकांच्या जीवनाची राखरांगोळी केल्याचे तेथील नागरिकांनी जाणले आहेच. हा झाला सामान्य नागरिकांचा क्षोभ. पण पाकिस्तानने पोसलेल्या दहशतवादी संघटना पाकिस्तानातच अराजक माजवू लागले आहेत. गेल्या वर्षभरात पाकिस्तानमध्ये अनेक हल्ले झाले. हजारो नागरिकांचे प्राण गेले आहेत. एका बाजूला पाकव्याप्त काश्मीरमधून भारतात राहण्याची मागणी होत आहे, तर दुसर्‍याबाजूला बलूचिस्तान पेटला आहे. सध्या पाकिस्तानची अवस्था पाकव्याप्त काश्मीर सांभाळू की बलूचीस्तान सांभाळू अशी झाली आहे.
आता पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय समुदायात कोणतीही सहानुभूती मिळणे अशक्य आहे. कारण आता पाकिस्तानची विकृत नीती पुरती उघडी पडली आहे. दोन दिवसांपुर्वीच पाकिस्तानचे माजी हुकुमशहा परवेज मुशर्रफ यांनी पाकमधील ‘दुनिया’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भारताविरुद्ध गरळ ओकण्याच्या नादात पाकिस्तानची आजवरची नीती उघडी पाडली आहे. त्यांनी जम्मु-काश्मीरात आमचेच अतिरेकी आहेत. लष्कर ए तोयबा ही दहशतवादी संघटना आम्हीच जन्माला घातली आहे, अशी जाहीर कबूली दिली आहे. हाफिज सईद, झकिउर रहमान लखवी आदींसारखे दहशतवादी त्यांनी पाकसाठी दहशतवादी नसून स्वातंत्रसैनिक आहेत अशी मुक्ताफळे उधळली. मुलाखत घेणार्‍या पाकिस्तानी वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने हे लोक स्वातंत्र सैनिक कसे ठरु शकतात असा सवाल उपस्थित केला, पण मुशर्रफ त्यांना स्वातंत्र सैनिक ठरवण्यात दंग होते. याचा अर्थ असाच होतो की, पाकिस्तानच्या एका माजी राष्ट्रप्रमुखाने पाकिस्तान दहशतवादी कारवाया करतो हे कबूल केले आहे त्यामुळे त्यामुळे पाकिस्तानने आजवर केलेल्या  कुकृत्यांवर शंका घेण्याचे कारण नाही.
पाकिस्तानमध्ये येऊ घालणार्‍या भयानक स्थितीची जाणीव बहुदा पाकिस्तानी माध्यमांना झाली आहे. काही आंतरराष्ट्रीय अभ्यासकांनी पाकिस्तानचे तुकडे होण्याची शक्यताही वर्तवली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणाकडे पाकिस्तानी माध्यमं अतिशय गंभीरपणे पहात आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी गेल्या काही महिन्यात केलेली विधाने आणि कृती पाहता देशवासियांना खात्री झाली आहे की, आता पाकिस्तानची खैर नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांची रणनीती हा वेगळ्या लेखाचा विषय आहे. लवकरच पाकव्याप काश्मीर पुन्हा भारताचा भाग होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे.
•चौफेर : अमर पुराणिक•
सर्व थरातून भारताच्या ऐक्याला, विकासाला बाधा आणण्याचे उद्योग अतिरेक्यांप्रमाणेच हे सेक्यूलरवादीही करत आले आहेत. तस्लिमा नसरिन यांनी अशा आस्तिनातील निखार्‍यांच्या मुस्काटात मारली त्याबद्दल त्यांचे अभिनंदनच करायला हवे. कारण या विषयावर थेट बोलण्याचे धाडस बहूदा आजपर्यंत कोणी केलेले नसावे. पहिल्यांदाच भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात कणखर सरकार भारताला लाभल्यामुळे तस्लिमा नसरिन यांनी बोलण्याचे धाडस केले. तस्लिमांना हा विश्‍वास आहे की मोदी अयोग्य वागणार नाहीत म्हणूनच त्या हा गंभीर विषय बोलल्या. तस्लिमा नसरिन यांनी ढोंगी सेक्यूलरवादाचे बींग फोडून भारताचे हीतच साधले आहे.
प्रख्यात बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरिन यांनी नुकताच भारतातील सेक्यूलरवाद्यांच्या ढोंगी धर्मनिरपेक्षतेच्या खेळीचा बुरखा फाडला आहे. गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आता ही सेक्यूलरवाद्यांची नवी फळी कार्यरत झाली आहे. प्रत्येक गोष्टीला नरेंद्र मोदीच जबाबदार आहेत असे ठासून सांगण्याचा अट्टाहास या लोकांनी चालवला आहे. या आधी गेल्या १४-१५ वर्षापासून अनेक सेक्यूलरांच्या झुंडी कल्पोकल्पित आरोप करता करता गारद झाल्या, आता ही सेक्यूलर लेखकांची नवी फळी विरोधात उतरली आहे. मुळात या ढोंगी धर्मनिरपेक्ष सेक्यूलरांना मोदींचे विरोधक म्हणण्यापेक्षा राष्ट्रवादाचे, भारताचे विरोधक म्हटले तर जास्त संयुक्तिक ठरेल.
तस्लिमा नसरिन या अतिशय उत्तम लेखिका आहेत. पेशाने डॉक्टर असलेल्या तस्लिमा यांनी वैद्यकीय सेवेबरोबरच लिखाणाचे आणि समाजसेवेचे व्रत घेतले. १९८० च्या दशकात त्यांची सहित्यिक कारकीर्द सुुरु झाली. त्यांच्या स्त्रीवादी लेखनामुळे त्यांचा खूप नावलौकिक झाला. विशेषत: मुस्लिम समाजातील दोषांवर त्यांनी आसूड ओढले. त्यांच्या इस्लामविरोधी लेखनामुळे त्यांना प्रचंड त्रास सोसावा लागला, देशही सोडावा लागला. त्यांनी ‘लज्जा, ओपोरपोक्ष, निमोंत्रोन, फेरा, अमार मेयेबेला, द्विखंडितो, उतल हवा’ अशा एका पेक्षा एक वरचढ कलाकृती सादर केल्या आहेत. तस्लिमांच्या अनेक पुस्तकांवर बंदी घालण्यात आली आहे. मराठीसह अनेक भाषांत त्यांच्या पुस्तकांचे भाषांतर करण्यात आले आहे. तस्लिमा नसरिन यांना त्यांनी ओढलेल्या इस्लामवरील आसूडामुळे त्यांना बांगलादेश सोडून बाहेर पडावे लागले. भारतावर त्यांचे विशेष प्रेम असल्यामुळे त्यांनी भारतात राहणे पसंत केले. पण भारतातील सेक्यूलर सरकारने त्यांना कायमस्वरूपी राहण्याची परवानगी दिलेली नव्हती. असे असले तरीही त्यांनी समाजातील वाईट प्रवृत्तीवर प्रहार करणे सोडलेले नाही.
भारतातही त्यांना मुसलमानांकडून थेट विरोध झाला तर तथाकथित धर्मनिरपेक्ष सेक्यूलरांनी त्यांचा छूपा विरोध केला. मागे त्यांच्या एका पुस्तकाचे प्रकाशन हैदराबाद येथे झाले होते, तेव्हा काही मुस्लिम समाज कंटकांनी त्यांच्यावर हल्ला केला व प्रकाशन समारंभ बंद पाडला. याहून दुदैवी बाब म्हणजे सेक्यूलरवादाचा पुरस्कार करणारे अनेक पुरोगामी विद्वान त्यावेळी मुग गिळून गप्प बसले होते. त्यांचा सेक्यूलरवाद नेमका अशावेळी कोठे पेंड खायला गेला होता? गेल्या काही दिवसांपासून अनेक भारतीय लेखकांनी साहित्य अकादमी पुरस्कार परत करण्याचा सपाटा लावला आहे. कशासाठी? तर मोदींच्या विरोधासाठी. या तथाकथित विद्वानांच्या मते भारतातील स्थिती कधी नव्हे इतकी चिघळली आहे. यांच्या मते गेल्या साठ वर्षांत भारताची स्थिती अतिशय चांगली होती, पण भाजपा सरकार सत्तेत आल्यापासून स्थिती ढासळली आहे. समाजात खूप असहीष्णूता पसरली आहे. आता अशा या विद्वानांना काय म्हणावे? हे या देशातच राहतात का? असा प्रश्‍न निर्माण होतो. की यांच्या नियतीतच खोट आहे?
कारण कधी नव्हे इतकी देशाची सध्या समाधानकारक स्थिती आहे. त्यामुळे मग अशा सेक्यूलर पुरोगाम्यांना कोणते मुद्दे मिळेनासे झाले आहेत. म्हणून थोडे कोठे खूट्ट झाले की माध्यमे आणि ही तथाकथित विद्वान सेक्यूलर लेखक मंडळी ओरड करायला सुरुवात करतात. राईचा पर्वत करण्याचा प्रयत्न करायचा आटोकाट प्रयत्न सुरु आहेत. यातूनच ही पुरस्कार परत करण्याची नौटंकी सुरु आहे. पुरस्कारांचा मोदी सरकारशी काहीही संबंध नसताना मोदी सरकारला झोडपण्याचा एक कलमी कार्यक्रम सुरु आहे. हे पुरस्कार मोदी सरकार देत नाही तर केवळ पुरस्काराची रक्कम सरकारकडून साहित्य अकादमीला प्राप्त होते. मग हे लोक पुरस्कार परत आहेत, पण पुरस्काराची रक्कम परत केली असे अजून कोणाचे नाव ऐकायला मिळाले नाही. यांचा रोष अकादमीवर नसून सरकारवर असेल तर यांनी पुरस्काराची रक्कम परत करायला हवी ना? मुळात यातील पुरस्कारप्राप्त लेखकांना ९९ टक्के सामान्य भारतीय नागरिक ओळखत देखील नाहीत. मग यांना पुरस्कार मिळाले कशाच्या आधारावर? असा प्रश्‍न सामान्य भारतीयांच्या मनात उभा राहणारच.
क्षमता, विद्वत्ता नसलेल्या तिनपाट लेखकांचा हा धंदाच झाला आहे. पहिल्यांदा वशिलेबाजी, लांगुलचालन करुन पुरस्कारासाठी वर्णी लावून घ्यायची नंतर पुरस्कार परत करून वादळ निर्माण करुन प्रसिद्धी मिळवायची. मुळात हा मुद्दा येवढ्‌यावर मर्यादीत रहात नाही. तर यामागे विदेशी प्रवृत्तीचा हात आहे हे नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही.
तस्लिमा नसरिन यांनी बेडगी धर्मनिरपेक्षवाद्यांच्यावर्मावर नेमके बोट ठेवले आहे. तस्लिमांनी हेच सांगितले आहे की, ही तथाकथित धर्मनिरपेक्ष मंडळी सेक्यूलरवादाच्या नावाखाली हिंदूत्वावादाचा विरोध करतात आणि इस्लामिक दहशतवादाचा बचाव करतात. हीच का यांची धर्मनिरपेक्षता? भारतातल्या ढोंगी धर्मनिरपेक्षवाद्यांवर तस्लिमा नसरिन यांनी जोरदार आसूड ओढला आहे आणि तो योग्यच आहे. कारण भारतातील सेक्यूलर विचारवंत, कॉंग्रेस, समाजवादी पार्टी, तृणमुल कॉंग्रेस, कम्यूनिस्ट पार्टी आणि प्रसारमाध्यमे कट्टरवादी मुस्लिमांच्या दहशतवादी कृत्यांचे समर्थन राजरोसपणे करत आहेत. याकूबच्या फाशीनंतर आपण सर्व भारतीयांनी हे चित्र स्पष्टपणे पाहिले आहे. कॉंग्रेसचे अनेक नेते अशा दहशतवाद्यांचे आदरार्थी संबोधन करतात. सोशल मिडियावर यावर प्रचंड राळ उठली होती. कसाबजी, लादेनजी असे दहशतवाद्यांचे संबोधन करताना यांना लाज कशी वाटली नव्हती. हाच संताप तस्लिमा नसरिन यांनी व्यक्त केला आहे. मुस्लिम मतांवर डोळा ठेवून दहशतवाद्यांचे समर्थन करणे हे अतिशय घृणास्पद कृत्य आहेच पण त्याहीपेक्षा जास्त हा भारतातील राष्ट्रवादी मुस्लिमांचा, भारतावर प्रेम करणार्‍या मुस्लिमांचा हा घोर अपमान आहे.
तस्लिमा नसरिन यांनी पश्‍चिम बंगालमधील उदाहरण सांगितले आहे, की पश्‍चिम बंगालमध्ये अनेकदा शेकडो हिंदूच्या घरांना आगी लागल्या गेल्या तेव्हा हे सेक्यूलर लोक काहीच बोलले नाहीत. पण हेच जर एखाद्या मुसलमानाबाबत घडले असते तर सारेच सेक्यूलर पेटून उठले असते. सेक्यूलरवाद्यांनी अशी विकृत नीती केवळ पश्‍चिम बंगालमध्येच राबवलेली नाही तर संपुर्ण भारतात कोठेही हिंदूंवर अन्याय झाला तर ही धर्मनिरपेक्षवादी मंडळी तोंडाला कुलुप लावून गप्प बसतात. पण एखाद्या मुस्लिमाच्या राष्ट्रद्रोही कृत्याचे उघड-उघड समर्थन करताना यांचा धर्मनिरपेक्षवाद कोठे जातो? ही सेक्यूलर मंडळी भारतात मुस्लिमांवर अन्याय होतो असा खोटा धिंडोरा जगभर पिटण्याचाच प्रयत्न करत असतात. तस्लिमा नसरिन म्हणाल्या ते तंतोतंत खरे आहे. कारण जर मुस्लिमांवर भारतात अन्याय झाला असता तर ते पाकिस्तान, बांगलादेशात कायमचे रहायला गेले असते. वस्तूस्थिती मात्र याच्या उलटी आहे. गेल्या पंधरा-वीस वर्षात लाखो बांगलादेशी नागरिकांनी भारतात घुसखोरी केली आहे. तर शेकडो पाकिस्तानी नागरिक भारतात, विशेषत: काश्मीरमध्ये घुसखोरी करुन कायमचे येथेच राहिले आहेत. हे सर्व भारतातील सेक्यूलरवाद्यांना चालले पण तस्लिमा नसरिन यांना कायमचे भारतीय नागरिकत्व न देण्याबाबत हे सेक्यूलर लोक कॉंग्रेसला पाठींबाच देत होतो. या धर्मनिरपेक्षवाद्यांना आणि कॉंग्रेसला देशद्रोही कृत्ये करणारे घुसखोर चालतात पण तस्लिमा नसरिन सारखी एक प्रामाणिक स्त्रीवादी लेखिका चालत नाही.
सहिष्णूतेच्या नावाखाली चालवलेले हे पुरस्कार परत करण्याचे उद्योग म्हणजे फक्त स्वहीत साधण्याचा प्रयत्न नसून यापाठीमागे मोठमोठ्‌या आंतरराष्ट्रीय संघटनांकडून पैसा उकळण्याचा धंदा सुरु आहे. गेल्या चौदा वर्षात मोदी यांच्या विरोधात तीस्ता सेटलवाड यांनी हाच उद्योग केला. रेमन मॅगॅसेस पुरस्कार मिळणारी तथाकथित लेखिका अरुंधती रॉय हीनेही हाच धंदा केला. अशी अनेक उदाहरणे आहेत. परदेशी पैशावर भारतातील शांतता आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे काम आता अशी विभूषित मंडळी करत आहेत. सर्व थरातून भारताच्या ऐक्याला, विकासाला बाधा आणण्याचे उद्योग अतिरेक्यांप्रमाणेच हे सेक्यूलरवादीही करत आले आहेत. तस्लिमा नसरिन यांनी अशा आस्तिनातील निखार्‍यांच्या मुस्काटात मारली त्याबद्दल त्यांचे अभिनंदनच करायला हवे. कारण या विषयावर थेट बोलण्याचे धाडस बहूदा आजपर्यंत कोणी केलेले नसावे. पहिल्यांदाच भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात कणखर सरकार भारताला लाभल्यामुळे तस्लिमा नसरिन यांनी बोलण्याचे धाडस केले. तस्लिमांना हा विश्‍वास आहे की मोदी अयोग्य वागणार नाहीत म्हणूनच त्या हा गंभीर विषय बोलल्या. तस्लिमा नसरिन यांनी ढोंगी सेक्यूलरवादाचे बींग फोडून भारताचे हीतच साधले आहे.
•चौफेर : अमर पुराणिक•
प्रत्येक गोष्टीला पंतप्रधान मोदींना जबाबदार धरण्याची चढाओढ चालवली आहे. स्वत:ला विद्वान म्हणवून घेणार्‍या लेखक-विचारकांचा एक समुह हेच काम करतोय. ही लेखक मंडळी धडाधड साहित्य अकादमी पुरस्कार परत करत आहेत. ही तथाकथित विचारक मंडळी एक असे वातावरण निर्माण करु पहात आहेत की, देशात प्रचंड असहिष्णूता माजली आहे, सामाजिक असंतोष पसरला आहे. पण वस्तूस्थिती ही आहे की हिच सेक्यूलर विद्वान मंडळी समाजात धार्मिक तेढ निर्माण करत आहेत. हिंदू-मुस्लिमांमध्ये तणाव निर्माण करण्याचा उद्योग करत आहेत.
दादरीच्या घटनेनंतर सेक्यूलर मंडळींनी आपल्या असंबद्ध वागण्या-बोलण्याचा कहर केला आहे. दादरीतली मूळ घटना काय घडली आहे, तेथील वस्तूस्थिती काय आहे याचा कोणताही अभ्यास न करताच आपली सद्सद् विवेकबुद्धी गहाण ठेवून प्रत्येक गोष्टीला पंतप्रधान मोदींना जबाबदार धरण्याची चढाओढ चालवली आहे. स्वत:ला विद्वान म्हणवून घेणार्‍या लेखक-विचारकांचा एक समुह हेच काम करतोय. ही लेखक मंडळी धडाधड साहित्य अकादमी पुरस्कार परत करत आहेत. ही तथाकथित विचारक मंडळी एक असे वातावरण निर्माण करु पहात आहेत की, देशात प्रचंड असहिष्णूता माजली आहे, सामाजिक असंतोष पसरला आहे. पण वस्तूस्थिती ही आहे की हिच सेक्यूलर विद्वान मंडळी समाजात धार्मिक तेढ निर्माण करत आहेत. हिंदू-मुस्लिमांमध्ये तणाव निर्माण करण्याचा उद्योग करत आहेत.
या सेक्यूलर मंडळींना गोहत्येचा विरोध करणार्‍यांचा राग येतो, या सेक्यूलरांना पाकिस्तानी लेखकाच्या पुस्तकाच्या भारतातील प्रकाशन कार्यक्रमाला झालेल्या विरोधाचा राग येतो. यांना गुलाम अलीच्या कार्यक्रमाला विरोध केल्याबद्दलही राग येतो. यांना पाकिस्तानी अभिनेत्यांना, कलावंतांना भारतात आमंत्रित केल्याचा विरोधाचाही राग येतो. दहशतवादी कसाब, मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणणार्‍या याकुब मेमनला दिलेल्या फाशीचाही राग येतो. पण कोठे हिंदू बळी ठरला तर मात्र हे सेक्यूलर विचारवंत वाळूत तोंड खूपसून बसतात. अशा या सेक्यूलर विद्वानांचा मानवतावादाचा दावा खोटा आहे. यांच्या वागण्याचा अर्थ असाच होतो की मानवतावादाच्या नावाखाली ही मंडळी पाकिस्तानचे समर्थन करतात.
मूळात साहित्य अकादमीचा भारत सरकारशी कसलाही थेट संबंध नाही, ती एक स्वायत्त संस्था आहे. तरीही हे लादण्याचा प्रयत्न केला जातोय की साहित्य अकादमी मोदी सरकारचे आहे. साहित्य अकादमी पुरस्कार परत करणारे कॉंग्रेस सरकारच्या काळात झालेल्या हत्यांचाही आरोपही मोदी सरकारवर लादण्याचा प्रयत्न करताहेत. ते असहिष्णूता वाढलेली आहे, सेक्यूलरिझम आणि स्वातंत्र्य धोक्यात आल्याची कोल्हेकुई करण्याचा प्रयत्न करत आहेत. लेखक मंडळी एकएक करुन पुरस्कार परत करुन हे भासवण्याचाच प्रयत्न करत आहेत. यातून ही मंडळी सेक्यूलरिझमच्या विकृतचालीला बळी पडलेले दिसत आहेत.
२३ जून २०१५ रोजी एक तरुण खेळण्यातली बंदूक घेवून आपली सेल्फी काढत होता तेव्हा पाकिस्तानी पोलिसांनी त्याची हत्या केली. तेव्हा न पाकिस्तानने याचा विरोध केला न या सेक्यूलरांनी आवाज उठवला. जर इज्राईल पोलिसांच्या गोळीने कोणी पॅलेस्तीनी नागरिक घायाळ झाला तर जगभरातले वामपंथी आणि सेक्यूलर मंंडळी गदारोळ करतील, सेक्यूलर पत्रकार, लेखक भरभरून रकाने लिहून इज्राईलचा निषेध करतील. जेव्हा अमेरिकेने इराकवर हल्ला केला तेव्हा जगभरातील सेक्यूलरांनी युद्धाच्या विरोधात निदर्शनं आणि लेखन केले. नुकतेच सौदी अरबने यमनवर हवाई हल्ले केले तेव्हा मात्र हे सेक्यूलर झोपले होते. पाकिस्तानी सेना बलूचिस्तानात नियमितपणे लोकांची हत्या करतेय पण हे या सेक्यूलरांना दिसत नाही तेव्हा यांच्या तोंडून पाकिस्तान विरुद्ध ब्र निघत नाही. भारतातील मानवाधिकारांची चिंता करण्याचा दावा करणार्‍या सेक्यूलर पत्रकारांना, लेखकांना तेव्हा मात्र राग येत नाही जेव्हा पीडित हिंदू असतो. तेव्हा यांचा मानवतावाद कोठे गेलेला असतो?
भारतीय सेक्युलरवाद्यांच्या डोळयावर एक खास प्रकारचा चश्मा चढवलेला आहे. दादरी प्रकरणावरून थयथयाट करणारे सेक्यूलर भारतातील अनेक घटनांबाबत मात्र मुग गिळून गप्प बसलेले आहेत. मागच्या ऑगस्ट महिन्यात सेनेचे जवान वेदमित्र चौधरी याची मेरठजवळ एका विशिष्ठ जमावाने हत्या केली. मार्चमध्ये एका मुस्लिम मुलीबरोबर लग्न केले म्हणून बिहारमधील हाजीपूरमध्ये एका हिंदू तरुणाची निर्घुण हत्या केली गेली. मागच्या वर्षी जूनमध्ये आंध्रप्रदेशातील इलूरजवळ एकाला जमावाने ठार मारले. जूनमध्येच मुंबईतील पश्‍चिम भांडुप परिसरात अशीच जमावाने एकाची हत्या केली. या शिवाय हजारो घटना आहेत की ज्या कधी प्रसिद्धीत आल्या नाहीत. सेक्यूलर माध्यमं आणि या सेक्यूलर लेखकांना या घटना त्यांच्या सेक्यूलर चष्म्यातून दिसत नाहीत का?
भारतीय सेक्यूलरवाद्यांच्या डोळ्यावर एक खास रंगाचाच चष्मा चढलेला नाही तर तो चष्मा अर्धा पाकिस्तानीही आहे. सेक्यूलर नेते अखिलेश यादव यांनी लखनऊमध्ये गुलाम अली यांचा आदर सत्कार केला. अरविंद केजरीवाल यांनीही गुलाम अली यांचा दिल्लीत कार्यक्रम ठरवला. ‘संगीताचा आणि धर्माचा संबंध नाही, संगीताला राष्ट्राच्या सीमा नसतात’ वगैरे वाक्य यांच्या सोयीच्या राजकारणासाठी आहेत हे कोणी दूधखूळाही सांगेल. कारण केजरीवाल आणि अखिलेश यांना ऑस्कर विजेता संगीतकार ए.आर. रहमान याला निमंत्रित करावेसे वाटले नाही. जेव्हा रजा अकादमीच्या फतव्यामुळे १३ सप्टेंबरचा रहमानचा कार्यक्रम रद्द केला गेला तेव्हा या सेक्यूलर लेखकांना इतक्या मोठ्‌या संगीतकाराबद्दल काही देणे घेणे नव्हते का? तेव्हा यांचा बेडगी मानवतावाद कोठे गेला होता? या सेक्यूलर भारतीय लेखक आणि सेक्यूलर मंडळींच्या सेक्यूलर व्याख्येत हिंदू तर सोडाच पण भारतीय राष्ट्रीय विचारांचे मुस्लीमही बसत नाहीत. याशिवाय सलमान रश्दीसारखा भारतीय लेखकही यांना खूपतो. दुसर्‍या एक सेक्यूलर नेत्या ममता बॅनर्जी यांनी गुलाम अली यांना हे सांगून समर्थन दिले की संगीताला सीमा नसते. असे सांगणार्‍या ममता बॅनर्जींना पश्‍चिम बंगालमधील राष्ट्रीय विचारांच्या किती मुस्लीम गायकांना, वादकांना सन्मान दिला? कलेला सीमा नसते असे सांगणार्‍या ममता बॅनर्जी बांग्लादेशी लेखिका तसलीमा नसरीन यांना का विरोध करतात?
एका परदेशी स्तंभलेखकाने म्हंटले आहे की भारतीय सेक्यूलरवाद खरेच पाकिस्तानी आहे. भारतीय सेक्यूलरवाद राष्ट्राला प्रतिकूल आहे. हे या परदेशी स्तंभलेखकाने सांगितले पण भारतातील सेक्यूलर मंडळी मात्र हे मान्य करणार नाहीत. भारतातील अनेक सेक्यूलर वकील आतंकवादी याकूब मेमन याची फाशी रद्द करण्यासाठी न्यायालयात धावले, रात्र-रात्र झटले, मात्र यांना सामान्य भारतीयांच्या मृत्यूदंडाची चिंता वाटली नाही. १९४७ साली आपल्या काही लोकांनी विचार केला की फाळणी करुन देश वेगळा केला तर कायमची शांतता मिळेल, पण तसे झाले नाही. सोनिया-मनमोहनच्या सेक्यूलर सरकार कारगिलप्रकरणात मुशर्रफ यांच्याशी चर्चा करताना काश्मीरचा काही भाग पाकिस्तानला देण्याच्या निर्णयापर्यंत गेले होते. अशा अनेक राष्ट्राच्या दृष्टीने घातक घटना या सेक्यूलर मंडळींना दिसत नव्हत्या.
१ ऑक्टोबर दरम्यान अजुन एक सेक्यूलर लेखिका शोभा डे यांनी ट्वीटरवर टीवटीवाट केला आहे. ‘मी गोमांस खाल्ले आहे. या, मला मारा’. प्रश्‍न हा आहे की, या डे बाईंमध्ये इतर धर्मीयांच्या भावना दुखावणारे वक्तव्य करण्याची हिम्मत आहे का? भारतातील हिंदू आणि राष्ट्रीय विचारांचे लोक सहिष्णू आहेत म्हणूनच इतके बोलण्याची हिम्मत होते. हिम्मत असेल तर पाकिस्तानात जाऊन त्यांच्याबद्दल असे बोलून दाखवा, व्यक्तीस्वतत्र्य सोडाच, तुमचे हाड ही शिल्लक राहणार नाही. अभिनेता अमीर खानने पीके या सिनेमात हिंदूंचे दैवत असलेल्या भगवान शंकराचा अवमान केला, त्यावर काही हिंदूंनी थोडा निषेध व्यक्त केला बस इतकच. त्याची प्रेषित मुहम्मद पैगंबरांची अशी टवाळी करण्याची हिम्मत आहे का? असे अमीर खानने केले तर त्याचे मुंडके शिल्लक राहणार नाही.
पाकिस्तान भारताविरुद्ध छूपेयुद्ध कायमच खेळतोय. सोशल मिडियाच्या माध्यमातून हे छुपे युद्ध कसे चालले आहे याची माहिती भारतीयांना मिळत आहेच. पाकिस्तानने कोणत्याही औपचारिक युद्धाची घोषणा केलेली नाही, पण भारतीय या तथ्याशी चांगलाच परिचित आहे की तो कायम युद्धस्थितीतच आहे. भारतीय सेक्यूलरवाद हा पाकिस्तानच्या इस्लामिकांच्या समर्थनाविना चालूच शकत नाही. भारतीय युवक सेक्यूलरवाद्यांचा हा दुतोंडीपणा ओळखून आहे. भारतीय पत्रकार, लेखक कधी न्यूयॉर्कमध्ये तर कधी दादरीमध्ये जनतेचा सपाटून मार खातात. सोशल मिडियावर यांना दलाल, प्रेस्टिट्‌यूट, बाजारू मिडिया अशा शब्दात संबोधले जाते. कारण ते एखाद्या बंगल्यासाठी, अर्थिक लाभासाठी किंवा अन्य काही लाभासाठी आपला आत्मा विकत आहेत. अशा या लेखक, पत्रकारांची यापेक्षा वाईट काय मानहानी असणार आहे, आणि असल्या लेखकांवर जनता का म्हणून विश्‍वास ठेवेल!
•चौफेर : अमर पुराणिक•
सत्तेत आल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत विदेशी दौरे करत असल्याची ओरड काही प्रसार माध्यमांनी आणि विरोधकांनी केली आहे आणि अजूनही सुरु आहे.  लंडनमधील एका वृत्तपत्राने विदेशी गुंतवणूकीवरील अहवाल प्रसिद्ध केला आहे. गेल्या सहा महिन्यात भारताला घवघवीत अशी विदेशी गुंतवणूक लाभली आहे. विदेशी गुंतवणूकीत भारताने चीनला मागे टाकत प्रथम क्रमांक पटकावला आहे. भारताला गेल्या वर्षीच्या तुलनेत ३३ टक्के इतकी भरघोस गुंतवणूक मिळाली आहे. या बातमीने मोदींविरुद्ध ओरड करणार्‍या प्रसारमाध्यमांना आणि विरोधकांना सणसणीत चपराक बसली आहे.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाप्रणित रालोआ सरकार सत्तेत आल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत विदेशी दौरे करत असल्याची ओरड काही प्रसार माध्यमांनी आणि विरोधकांनी केली आहे आणि अजूनही सुरु आहे.  लंडनमधील एका वृत्तपत्राने विदेशी गुंतवणूकीवरील अहवाल प्रसिद्ध केला आहे. गेल्या सहा महिन्यात भारताला घवघवीत अशी विदेशी गुंतवणूक लाभली आहे. विदेशी गुंतवणूकीत भारताने चीनला मागे टाकत प्रथम क्रमांक पटकावला आहे. भारताला गेल्या वर्षीच्या तुलनेत ३३ टक्के इतकी भरघोस गुंतवणूक मिळाली आहे. या बातमीने मोदींविरुद्ध ओरड करणार्‍या प्रसारमाध्यमांना आणि विरोधकांना सणसणीत चपराक बसली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या विदेशी दौर्‍यामधून काय साध्य केले याचा हा पुरावा आहे.
लंडन येथील वृत्तपत्र फायनान्शियल टाईम्सच्या अभ्यासानुसार जानेवारी २०१५ ते जून २०१५ या सहा महिन्यात भारतात ३१ अब्ज डॉलरची प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक झाली आहे. मागील अनेक वर्षांपासून जगातील सर्वात अधिक विदेशी गुंतवणूक मिळवणार्‍या चीनला या अवधित २८ अब्ज डॉलरची गुंतवणूक प्राप्त झाली आहे. गेली अनेक वर्षे प्रथम क्रमांकावर असलेल्या चीनला  गेल्या सहा महिन्यात भारताने मागे टाकले आहे. तिसर्‍या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेला २७ अब्ज डॉलर परकिय गुंतवणूक मिळाली आहे. फायनान्शियल टाईम्सने २०१५ या वर्षातील पहिल्या सहामाहीत सर्वात अधिक विदेशी गुंतवणूक मिळवणार्‍या १० राष्ट्रांची यादी जाहीर केली आहे. ती अशी- भारत : ३१ अब्ज डॉलर, चीन : २८ अब्ज डॉलर, युनायटेड स्टेटस ऑफ अमेरिका : २७ अब्ज डॉलर, ब्रिटन : १६ अब्ज डॉलर, मेक्सिको : १४ अब्ज डॉलर, इंडोनेशिया : १४ अब्ज डॉलर, व्हियेतनाम : ८ अब्ज डॉलर, स्पेन : ७ अब्ज डॉलर, मलेशिया : ७ अब्ज डॉलर आणि ऑस्ट्रेलिया : ७ अब्ज डॉलर. भारताने मिळवलेली३१ अब्ज डॉलरची गुंतवणूक यासाठी महत्त्वाची ठरते की, भारताला इतकी भरभक्कम विदेशी गुंतवणूक मिळत असताना जगातील अन्य देशांतील विदेशी गुंतवणूक मोठ्‌या प्रमाणात घटली आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे अग्नेय अशियातील व्हियेतनाम, इंडोनेशिया आणि मलेशिया हेही विदेशी गुंतवणूकीसाठी मनपसंत देश बनले आहेत.
फायनान्शियल टाईम्सच्या वृत्तानुसार सन २०१४ सालच्या जानेवारी ते डिसेंबर या १२ महिन्यातील टॉप टेन विदेशी गुंतवणूक मिळवणार्‍या देशांची यादीही आकडेवारीसह दिली आहे. चीन : ७५ अ    ब्ज डॉलर, युनायटेड स्टेटस ऑफ अमेरिका : ५१ अब्ज डॉलर, ब्रिटन : ३५ अब्ज डॉलर, मेक्सिको : ३३ अब्ज डॉलर, भारत : २४ अब्ज डॉलर, व्हियेतनाम : २४ अब्ज डॉलर, मलेशिया : १९ अब्ज डॉलर, ब्राझिल, इंडोनेशिया : १७ अब्ज डॉलर. सन २०१४ मध्ये भारताला २४ अब्ज डॉलर इतकी विदेशी गुंतवणूक मिळाली होती आणि या वर्षीच्या पहिल्या सहाच महिन्यात भारताला ३१ अब्ज डॉलर इतकी गुंतवणूक मिळाली आहे. याचा अर्थ पंतप्रधान मोदी यांनी सत्ता हातात येताच यासाठी प्रयत्न सुरु केले. पहिल्या वर्षी चांगलीच परदेशी गुंतवणूक भारताला लाभली पण या वर्षी त्यांच्या प्रयत्नांचे खरे फळ मिळत आहे. वर्षाच्या सहाच महिन्यात सर्व देशांना भारताने मागे टाकले आहे. जागतिक मंदीच्या विळख्यात सर्व जग सापडले असतानाही भारताने प्रतिकूल परिस्थितीत हे यश मिळवले आहे. आजपर्यंतच्या इतिहासात बहूदा पहिल्या दहामध्येही नसणारा भारत या सहा महिन्यात सर्वश्रेष्ठ ठरला याची जगाच्या इतिहासात याची नोंेद घेतली गेली जाईल. चीनच्या बाबतील एक गोष्ट महत्त्वाची आहे की चीनला मिळणार्‍या विदेशी गुंतवणूकीपैकी हॉंगकॉंगला यातील ४० टक्के हिसा जातो.
इतर काही संस्थांनीही याची सर्वसाधारण आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. भारताच्या रिझर्व बँकेनेही विदेशी गुंतवणूकीची आकडेवारी दिली आहे. या आकडेवारीत काहीसा फरक दिसून येतो. फायनान्शियल टाईम्सच्या आकडेवारीच्या तूलनेत दूसर्‍या एका संस्थेच्या आकडेवारीप्रमाणे सिंगापूर, कॅनडा आणि नेदरलँड या देशांचा या पहिल्या दहामध्ये समावेश आहे. त्याचप्रमाणे भारतीय रिझर्व बँकेच्या आकडेवारीनुसार २०१५ च्या पहिल्या सहामाहीत भारताला २० अब्ज डॉलरची विदेशी गुंतवणूक मिळाली आहे, ही आकडेवारी फायनान्शियल टाईम्सच्या आकडेवारीच्या तूलनेत जवळजवळ ११ अब्ज डॉलर कमी आहे. आंतरराष्ट्रीय अर्थतज्ज्ञांच्या मते या फरकाचे कारण हे आहे की, फायनान्शियल टाईम्सने प्रस्तावांच्या आधारावर व इन-प्रोग्रेस असलेलीही आकडेवारी यात धरली आहे. फायनान्शियल टाईम्सच्या मते ३१ अब्ज कोटी विदेशी गुंतवणूकीचे प्रस्ताव झालेले आहेत तर रिझर्व बँकेने प्रत्यक्ष जमा झालेली विदेशी गुंतवणूकच यात समाविष्ट केली आहे त्यामुळे ही तफावत दिसून येते. केवळ रिझर्व बँकेची आकडेवारी जरी गृहीत धरली तरीही भारताला मिळालेल्या विदेशी गुंतवणूकीत ३३ टक्के वाढ झाली आहे हा एक मोठा विक्रम प्रस्तापित झाला आहे. या आधी सन २००७-०८ पासून सतत प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूकीत घसरण होत आली होती. ही घसरण सन २०१४ साली थांबली आहे, केवळ घसरण थांबलीच नाही तर भारताने मोठी उल्लेखनीय गरुड भरारी घेतली आहे हे मोदी सरकारचे मोठे यश आहे.
मोदी सरकार सत्तेत आल्यापासून ही उल्लेखनीय वृद्धी झालेली आहे याचे श्रेय निश्‍चित रुपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाते. ‘मेक इन इंडिया’ या उपक्रमाच्या माध्यमातून विदेशी दौरे करुन मोदी विदेशी उद्योजकांना भारतात औद्योगिक गुंतवणूकीसाठी सतत आव्हान करत आहेत. कोणत्याही देशात औद्योगिक भागीदारी गुंतवणूक करताना गुंतवणूकदार प्रमुख चार बाबींचा विचार करत असतात. पहिली बाब, गुंतवणूकीची सुरक्षितता, ज्यासाठी देशाची न्यायव्यवस्था मजबूत असणे महत्वाचे आहे. दुसरी, गुंतवणूकीच्या मुल्यात वृध्दी, यासाठी देशातील गुंतवणूकीचा बाजार विकासित असला पाहिजे. तिसरी, गुंतवलेल्या पैशावर मिळणारा नफा हा बँकेच्या मिळणार्‍या व्याजापेक्षा दुप्पट असला पाहिजे, यासाठी  सरकारची दीर्घकालीन उद्योगोन्मुख नीती असली पाहिजे. आणि चौथी बाब, देशात पोषक व्यवसायिक वातावरण असले पाहिजे. सरकारची नीती, धोरणे सुसंगत असली पाहिजेत. याशिवाय गुंतवणूकदार त्या देशाचे क्रेडिट रेटिंगही पाहात असतात. उल्लेखनिय बाब ही आहे की, जागतिक क्रेडिट रेटींग संस्थांनी अजूनही भारताची के्रडीट रेटींग किंवा गे्रेड वाढवलेली नाही. भारतातील विरोधी पक्षांनी, काही गैरसरकारी संघटनांनी आणि प्रसारमाध्यमांनी भारतविरोधी आणि नकारात्मक वातावरण तयार केलेले असतानाही भारतात इतकी भरघोस विदेशी गुंतवणूक होत आहे. विरोधकांनी, माध्यमांनी मोदी यांना उद्योजकांचे हीत पाहात असल्याचा आरोपही केला आहे. पण या विदेशी गुंतवणूकीमुळे भारत सक्षम आणि आत्मनिर्भर होणार आहे. मेक इन इंडियाच्या माध्यमातून भारतीय उद्योगांना यातूनच मोठे पाठबळ लाभणार आहे. गेल्या साठ वर्षाच्याकाळात अटल सरकारचा अपवाद वगळता भारताच्या तिजोरीत कायम खडखडाच होता. रसातळाला गेलेल्या भारताची पत, गुंतवणूक, उत्पन्न वाढवण्यासाठी विदेशी गुंतवणूक आवश्यक आहे. या गुंतवणूकीच्या माध्यमातूनच भारत स्वयंपुर्ण होणार आहे.
विदेशी गुंतवणूक वाढली याचा अर्थ ‘पी हळद अन हो गोरी’ असा होत नाही. याचे फायदे मिळायला थोडा काळ जावा लागतो. सध्या भारताने विकासाचा चांगला वेग साधलेला असला तरीही याची दीर्घकालिन रसाळ फळे चाखण्यासाठी आपल्याला किमान दोन-तीन वर्षे तरी वाट पहावी लागणार आहे. प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक हा एक विकासाच्या दीर्घप्रक्रियेचा पहिला टप्पा आहे. या विदेशी गुंतवणूकीतून भारताची स्वत:ची गुंतवणूक निर्माण करणे हा दुसरा टप्पा आहे. या गुंतवणूकीतून निर्माण होणारा भारताचा पैसा खर्‍या अर्थाने भारतीयांच्या हातात खेळणार आहे. यानंतरच पुढच्या टप्प्यात याची मधूर फळे देशाला चाखायला मिळणार आहेत. चीनने यासाठी आपल्या देशात अनेक सुविधा निर्माण केल्या आहेत. तेथे स्पेशल इकॉनॉमी झोन निर्माण केलेले आहेत. चीनमध्ये उद्योगांसाठी जमिन मिळवणे खूप सोपी प्रक्रिया आहे. भारतात मात्र ही मोठी समस्या आहे. यावर मात केल्यास भारत आणखी विकासाचा वेग साधू शकतो. त्यामुळेच भारत सरकारने पहिल्या टप्प्यात कमी जमीन लागणारे उद्योगांवर लक्ष केंद्रीत केले आहे. उदा. माहिती तंत्रज्ञान, टेलिकॉम, वीमा, बँकींग व अन्य सेवा क्षेत्रात सध्या मोठ्‌याप्रमाणात गुंतवणूक होत आहे. मोठे उद्योग, निर्मिती, संशोधन आदीसाठी मोठ्‌याप्रमाणात जागा लागते त्यामुळे भूमी अधिग्रहण कायदा झाल्यानंतरच असे दीर्घकालिन फायदा देणारे, मोठ्‌याप्रमाणात रोजगार देणारे उद्योग उभारले जाणार आहेत. यात विशेष बाब म्हणजे भारताचा संरक्षण व शस्त्रास्त्र उत्पादनाकडे कल आहे आणि यात गुंतवणूकीसाठी भारताला काही मोठे प्रस्ताव मिळालेले आहेत.
एकुणच २०१५ सालच्या पहिल्या सहा महिन्यात मोठ्‌याप्रमाणात विदेशी गुंतवणूक प्राप्त होणे निश्‍चितच उत्साहवर्धक आहे. येत्या सहा महिन्यात याहून अधिक गुंतवणूक मिळणे अपेक्षित आहे आणि यातील निम्म्याहून अधिक प्रकल्पांची कामेही मोठ्‌याप्रमाणात सुरु होतील.
•चौफेर : अमर पुराणिक•
भारतासाठी पाकव्याप्त काश्मिरचे विशेष रणनीतिक महत्त्व आहे. केंद्रात मोदी सरकार आल्यापासून पाकव्याप्त काश्मिरबाबत खूप सक्रीय झाला आहे. जर पाकव्याप्त काश्मिरमधील लोकांना अधिक जवळीकीने आणि सक्रिय दृष्टीकोनाने आपलेसे केले तर नरेंद्र मोदी मोठा इतिहास घडवू शकतील. कारण तेथील नागरिक स्वत:ला भारतीय म्हणवून घेऊ इच्छितात आणि मोदी सरकारच्या गुड गव्हर्ननंसने आणि वेगवान विकासकामांमुळे ते प्रभावित झाले आहेत. भाजपा काश्मिर केंद्रीत दृष्टीकोन पहिल्यापासून ठेऊन आहेच पण आता सत्ता हातात असल्यामुळे त्याला आकार देणे शक्य होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौर्‍यावर आहेत. त्यांचे अभूतपुर्व असे स्वागत करण्यात आले. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी त्याची विशेष दखल घेतली. त्यांनी संयुक्त राष्ट्र संघात अतिशय प्रभावी भाषण केले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा  परिषदेच्या विस्ताराची मागणी केली व भारताला स्थायी सदस्यत्व मिळण्यासाठी आग्रह धरला. मोदी यांनी आंतरराष्ट्रीय दहशतवादापासून ते आर्थिक विकासापर्यंत सर्वच बाजू मांडल्या. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी मात्र नेहमीप्रमाणे काश्मिरचाच मुद्दा आळवला. १९४७ मध्ये पाकिस्तानने बेकायदेशीररित्या काश्मिरचा भाग गिळंकृत केल्यापासून पाकचे संयुक्त राष्ट्रसंघात एक कलमी रडगाणं सुरु आहे. काश्मिरच्या मुद्द्यावर नेहमीप्रमाणे याहीवेळी नवाज शरीफ यांनी रडगाणं सुरु ठेवलं. खुद्द पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुणगाण केले. तर नवाज शरीफ यांच्याबाबत आणि पाकिस्तानच्या भूमिकेबाबत अनेक प्रश्‍नचिन्हं उपस्थित केली आहेत.
तिकडे शरिफ काश्मिरचा राग आळवत असतानाच इकडे पाकव्याप्त काश्मिरमध्ये तेथील नागरिकांनी निदर्शनं करत आमची पाकिस्तानच्या तावडीतून मुक्तता करा, आम्हाला भारतात रहायचे आहे अशी मागणी केली. पाकव्याप्त काश्मिरमध्ये खूप मोठ्‌या संख्येने लोक जमले होते. अशी मागणी मोदी सरकार सत्तेत आल्यापासून सुरु झाली आहे. आणि आता ती मागणी जास्त तीव्र होत आहे. पाकिस्तानने आजपर्यंत केवळ दहशतवादी कारवाया करण्यासाठी आणि चीनशी चुंबाचुंबी करण्यासाठी पाकव्याप्त काश्मिरचा वापर केला आहे. त्यामुळे तेथील लोक यात प्रचंड भरडले गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार सत्तेत आल्यापासून पाकव्याप्त काश्मिरमधील नागरिकांमध्ये आशा निर्माण झाली आहे की, मोदी काश्मिरचा मुद्दा सोडवतील आणि आम्हाला सुखाचे दिवस पहायला मिळतील. 
पाकिस्तान व्याप्त काश्मिर म्हणजे जम्मु काश्मिर आणि गिलगिट बाल्टिस्तान असा प्रांत आहे. पाकव्याप्त काश्मिर हे भारताचे अभिन्न अंग आहे. २२ ऑक्टोबर १९४७ रोजी पाकिस्तानने जम्मु-काश्मिरचा हा भाग गिळंकृत केला. हा भाग तेव्हापासून पाकिस्तानच्या बेकायदेशीर नियंत्रणात आहे. जम्मु-काश्मिर रियासतीचे राजे महाराज हरी सिंह यांनी जम्मु-काश्मिर रियासत भारतात विलय करण्याच्या करारावर हस्ताक्षर केले होते. पण तेव्हापासून हा भाग पाकिस्तानच्या अवैध कब्जात राहिला. भारत सतत पाकव्याप्त काश्मिर हा भारताचा अविभाज्य भाग आहे अशी भूमिका मांडत आलाय. पण कॉंग्रेस सरकारने विशेषत: नेहरु सरकारने यावर कोणतीही हलचाल केली नाही, प्रयत्नही केले नाहीत. त्यामुळे तेथील नागरिकांची आजतगयात उपेक्षा झाली आहे. त्यामुळे विकासाआभावी तेथील नागरिक अतिशय हलाकीच्या स्थितीत जगत आला आहे. पाकिस्तानने याच परिसरात दहशतवाद फोफाऊ दिला. तेथील नागरिकांच्या सामाजिक-आर्थिक उन्नतीसाठी पाकने तर काहीच केले नाही आणि पाकव्याप्त असल्यामुळे भारतही काही करु शकला नाही. संविधानिक प्रावधान आणि संसदीय प्रस्तावाप्रमाणे त्यांचे अधिकार आणि संरक्षण हे सरकारचे दायित्व आहे. मोदी सरकार आल्यापासून मात्र यावर हलचाली सुरु झाल्या आहेत. नुकतेच या मुद्द्यावर पाकिस्तानवर पलटवार करताना पीएमओचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी पाकिस्तानचे सैन्यप्रमुख राहिल शरीफ यांनी जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे.
ही पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याची घटना आणि पुढील घटनाक्रम फार महत्वाचा आहे कारण ६५-६६ वर्षांच्या निष्क्रीयतेनंतर भारत पाकव्याप्त काश्मिरबाबत आक्रमक झाला आहे. आणि भारताने हाच मुद्दा मध्यवर्ती केला आहे. नुकतेच अंजुमन मिन्हाज-ए-रसूलचे अध्यक्ष मौलाना सैयद अतहर हुसैन देहलवी यांनी पाकव्याप्त काश्मिरचा दौरा केल्यानंतर सांगितले की, येथील नागरिक भारताचा हिस्सा बनू इच्छितात. सध्या हीच बाब महत्त्वाची आहे की पाकव्याप्त काश्मिरमध्ये भारताच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या जात आहेत. त्यामुळे पाकिस्तान हताश झाला आहे. पाकिस्तानी माध्यमंही येथील घटनांची दखल घेत आहेत. दुदैवाने भारतीय माध्यमांना मात्र केवळ मोदीद्वेषाने पछाडले आहे, त्यामुळे काश्मिरच्या मुद्द्यावरील ही राष्ट्रहिताची घटना त्यांना दखलपात्र वाटत नाहीये. असो. गेल्या महिन्यात ७ सप्टेंबर रोजी नवाज शरीफ यांनी पाकव्याप्त काश्मिरमधील पुरग्रस्त भागाचा दौरा केला तेव्हा येथील नागरिकांनी त्यांचे स्वागत ‘गो बँक नवाज’ अशा नारेबाजीने केले आणि पाकिस्तान विरुद्ध जोरदार निदर्शने केली.
अशा पुराच्या संकटाच्या काळातही लोक संतापून निदर्शनं करतात याचा अर्थ हेच ध्वनीत करतो की तेथील लोक आता पाकिस्तानच्या दडपशाहीला वैतागले आहेत. पाकिस्तानच्या पुढाकाराने गेल्या अनेक दशकांपासून पाकव्याप्त काश्मिरच्या खोर्‍यात जे दहशतवादाने थैमान घातले आहे त्यापासून लोकांना सुटका हवी आहे. पाकने येथील साधनांचा वापर दहशतवादाला खतपाणी घालण्यासाठी केला, तेथील नागरिकांना जिहादच्या नावावर भडकवून त्यांच्या आयुष्याचे वाटोळे पाकिस्तानने केल्याची जाणिव विकासापासून कोसो दूर असलेल्या पाकव्याप्त काश्मिरमधल्या नागरिकांना झाली आहे. त्यामुळे नवाज शरीफ विरुद्ध हा संताप तेथील जनतेने व्यक्त केला. एकीकडे भारतभरातील राज्यात पंतप्रधान मोदी विशेष पॅकेज देऊन वेगवान विकास साधत आहेत तर पाकव्याप्त काश्मिरकडे पाक विकासाबाबतीत ढूंकुनही पहात नाही.
भारतासाठी पाकव्याप्त काश्मिरचे विशेष रणनीतिक महत्त्व आहे. केंद्रात मोदी सरकार आल्यापासून पाकव्याप्त काश्मिरबाबत खूप सक्रीय झाला आहे. जर पाकव्याप्त काश्मिरमधील लोकांना अधिक जवळीकीने आणि सक्रिय दृष्टीकोनाने आपलेसे केले तर नरेंद्र मोदी मोठा इतिहास घडवू शकतील. कारण तेथील नागरिक स्वत:ला भारतीय म्हणवून घेऊ इच्छितात आणि मोदी सरकारच्या गुड गव्हर्ननंसने आणि वेगवान विकासकामांमुळे ते प्रभावित झाले आहेत. भाजपा काश्मिर केंद्रीत दृष्टीकोन पहिल्यापासून ठेऊन आहेच पण आता सत्ता हातात असल्यामुळे त्याला आकार देणे शक्य होणार आहे. मोदींनी अमेरिकादौर्‍यात याची सुरुवात केलीच आहे. आंतरराष्ट्रीय कुटनितीत मोदींनी पाकिस्तानला चारीमुंड्‌या चीत केले आहे. आता येत्या काळात पाकव्याप्त काश्मिरबाबत निर्णायक कृती घडेल अशी आशा आहे.
•चौफेर : अमर पुराणिक•
गेल्या ६० वर्षात नेताजींच्या फाईल्स दाबून ठेऊन कॉंग्रेसने खेळलेल्या अनेक घाणेरड्‌या खेळी बाहेर पडत आहेत. शिवाय यातील अनेक पुरावे, फाईल्स कॉंग्रेस सरकारने नष्ट केल्या असण्याची शक्यता जास्त आहे. केंद्रात जवळजवळ कायमच कॉंग्रेसचेच सरकार होते. पंतप्रधान कार्यालयाच्या अखत्यारित त्या फाईल्स असल्यामुळे ते पुरावे नष्ट केले असल्याच्या संशयाला दुजोरा मिळतो. सेक्यूलरवादाचा जप करत कॉँग्रेसने विशेषत: नेहरु-गांधी घराण्याने मोगलशाहीच राबवली आहे.
नुकतेच पश्‍चिम बंगालच्या सत्तारुढ सरकारने गेल्या शुक्रवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधीत ६४ फाईल्स सार्वजनिक केल्या. आणि त्यामुळे नव्याने काही मुद्दे जगासमोर आले. १९४५ मध्ये विमान अपघातात नेताजींचा मृत्यू झाला होता ही बाब खोटी ठरली आहे. तर नेताजींच्या कुटुंबातील सदस्यांवर पाळत ठेवली जात होती, ते १९६४ पर्यंत ते हयात होते, तर दुसर्‍या माहितीप्रमाणे गुमनामी बाबांच्या रुपात सुभाषबाबू १९८५ पर्यंत जीवीत होते, याशिवाय अनेक मुद्दे समोर येत आहेत. केंद्र सरकारही लवकरच पंतप्रधान कार्यालयाच्या अख्त्यारित असलेल्या गोपनिय फाईल्स सार्वजनिक करण्याची शक्यता आहे.
नेताजींसंबंधित फाईल्स सार्वजनिक केल्यानंतर अनेक बाबींचा पुर्नविचार करावा लागणार आहे. गेल्या ६० वर्षात नेताजींच्या फाईल्स दाबून ठेऊन कॉंग्रेसने खेळलेल्या अनेक घाणेरड्‌या खेळी बाहेर पडत आहेत. शिवाय यातील अनेक पुरावे, फाईल्स कॉंग्रेस सरकारने नष्ट केल्या असण्याची शक्यता जास्त आहे. केंद्रात वाजपेयी सरकार वगळता जवळजवळ कायमच कॉंग्रेसचेच सरकार होते. पंतप्रधान कार्यालयाच्या अखत्यारित त्या फाईल्स असल्यामुळे ते पुरावे नष्ट केले असल्याच्या संशयाला दुजोरा मिळतो. सेक्यूलरवादाचा जप करत कॉँग्रेसने विशेषत: नेहरु-गांधी घराण्याने मोगलशाहीच राबवली आहे. सेक्यूलरच्या नावाखाली अनेकांची गळचेपी केलेली आहे. मी मागे अनेक लेखात सेक्यूलर हा शब्द आता शीवी झाला असल्याचे म्हटले होते ते यासाठीच. संघ, भाजपाच्या नावाने गळे काढत स्वत: असली अनेक अश्‍लघ्य कृत्यं जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी आणि सोनिया गांधींनी केली आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस असुद्या स्वा. सावरकर असुद्यात किंवा भगतसिंग असुद्या. प्रत्येक प्रखर राष्ट्रप्रेमी क्रांतीकार्‍यांबद्दल अशीच विकृत भूमिका नेहरु-गांधी घराण्याने ठेवली आहे. सत्तेच्या मोहापायी नेहरुंनी ब्रिटीशांची तळी उचलली तर इंदिरा गांधींनी त्याची री ओढली. आता सोनिया गांधीबद्दल तर बोलायलाच नको. त्यांचे इटलीप्रेम कमी न होता वाढतच आहे. त्यांना तर भारताचे नागरिकत्व घ्यायलाही लाज वाटली. गेल्या दहा वर्षाच्या सत्ताकाळात केवळ घोटाळे करण्यापलीकडे काहीही करता आलेले नाही. कोणतेही राष्ट्रहीत साधता आले नाही.
नेताजींचे नातू चंद्रकुमार बोस (सुभाषचंद्र बोस यांचे बंधू शरदचंद्र बोस यांचे नातू) यांनी कॉंग्रेसवर थेट आरोप केले आहेत. कॉंग्रेसने गठीत केलेले सर्व आयोग केवळ दिखाव्यासाठी होते. कॉंग्रेसने केवळ नाटकबाजी करुन देशाला धोका दिला आहे. चंद्रकुमार बोस यांनी काही महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधले आहे. १९५६ साली नेहरु सरकारने गठीत केलेल्या शाहानवाज खान कमिटीने नेहरुंच्या मर्जीप्रमाणे अहवाल तयार केले आहेत. यामागील वस्तूस्थिती अशी आहे की शाहनवाज खान हे आजाद हिंद फौजेत केवळ १५ महिनेच होते आणि ते नेहरु परिवाराच्या जवळचे स्नेही होते. येवढेच नव्हे तर शाहनवाज खान नेहरू सरकारमध्ये मंत्री होते. नेहरु सरकारने बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री विधानचंद्र राय यांना बोस परिवार आणि त्यांच्या समर्थकांवर पाळत ठेवण्याचेही आदेश दिले होते. चंद्रकुमार बोस यांच्या आरोपातील तथ्य हे आहे की, तेव्हा सुभाषचंद्र बोस समर्थक आणि फॉरवर्ड ब्लॉकच्या कार्यकत्यांना नक्सलवादी ठरवण्याचा प्रयत्न झाला होता. त्यानंतर १९७० मध्ये इंदिरा सरकारने खोसला अयोग गठित केला. पण खोसला आयोगाने प्रामाणिकपणे अहवाल सादर केला नसल्याचा आरोप चंंद्रकुमार बोस यांनी केला आहे. जस्टीस जी.डी. खोसला हेही नेहरु परिवाराचे जवळचे स्नेही होते. यात चंद्रकुमार बोस यांचा सर्वात गंभीर आरोप हा आहे की, खोसला आयोगाच्या तपासादरम्यान इंदिरा गांधी सरकारने नेताजींसंबंधीत महत्त्वाच्या चार फाईल्स नष्ट केल्या होत्या.
चंद्रकुमार बोस यांच्या मते १९९९ साली अटलबिहारी वाजपेयी सरकारने गठित केलेल्या जस्टीस मुखर्जी आयोगाने चांगले व प्रमाणिकपणे काम केले आहे. जस्टीस मुखर्जी यांच्या अहवालात हे सिद्ध झाले होते की नेताजींचा मृत्यू विमान अपघातात झाला नव्हता. पण अटल सरकारनंतर आलेल्या सोनिया गांधींच्या मनमोहन सरकारने तो अहवाल रद्द ठरवून केराच्या टोपलीत टाकला. यातील एका महत्त्वाच्या पैलूवर चंद्रकुमार बोस यांनी प्रकाश टाकला आहे की, जस्टीस मुखर्जी आयोगाला तपासादरम्यान १८ ऑगस्ट १९४५ नंतरच्या गुप्त फाईल्स दिल्या गेल्या नव्हत्या. आता मोदी सरकार मात्र यात लक्ष घालेल असा विश्‍वास चंद्रकुमार बोस यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे या अहवालावर संसदेत चर्चा करण्याची मागणी केली आहे. शिवाय नवी समिती गठित करुन त्यांना सर्व गुप्त कागदपत्रे द्यावीत जी कागदपत्रे जस्टीस मुखर्जी आयोगाला दिली गेली नव्हती, ती द्यावी. ज्यायोगे सत्य जगासमोर येईल, असे चंद्रकुमार बोस यांनी म्हटले आहे.
याबाबतीत अजून एक मुद्दा सांगितला जातो की, स्वातंत्र्यानंतर भारताला सत्ता हस्तांतरण करताना असा करार कॉंग्रेसने केला होता की, सुभाषबाबूंबद्दल ब्रिटीशांचीच भूमिका पुढे राबवली जाईल. यातील तथ्यही समोर येणे गरजेचे आहे. १९६४ मध्ये अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएकडील फाईल्समध्ये अशी माहिती आहे की सुभाषचंद्र बोस यांचा अपघातात मृत्यू झालेल्या बातमीवर सीआयएला विश्‍वास नव्हता. सीबीआयच्या अहवालात काही शक्यता जाहीर केल्या होत्या की सुभाषचंद्र बोस हे साधूच्या रुपात भारतात राहिले होते. असेच काहीसे मत जस्टीस मुखर्जी आयोगाने मांडले आहे. त्यात उत्तरप्रदेशात रहाणारे गुमनामी बाबा वा भगवानजी हेच सुभाषचंद्र बोस होते यावर प्रकाश टाकला आहे.
सुभाषचंद्र बोस यांचे मृत शरीर कोणी पाहिले नाही. त्यांच्या मृत शरीराचे छायाचित्रही उपलब्ध नाही. त्यांचे डेथ सर्टीफिकेटही नाही. सुभाषचंद्र बोस आपल्या सहकार्‍यांसोबत विमानात बसणार होते पण ऐनवेळी निर्णय बदलला. जपानची सुभाषबाबूंना मित्रराष्ट्रं आणि ब्रिटीशांपासून वाचवण्यासाठी सुरक्षित जागी पोहोचवण्याची गुप्त योजना होती. त्यांना प्रथम सुरक्षित स्थळी पोहोचवले आणि नंतर मृत घोषित केले असाही तर्क मांडला जातो. जपानमधील रेंकोजी मंदिरात ज्या अस्थि ठेवल्या आहेत त्या अस्थी सुभाषबाबूंच्या नसून जपानी सैनिक इचीरो ओकुरा याच्या असल्याचे मुखर्जी आयोगाने सिद्ध केले होते. या शिवाय अनेक तर्कवितर्क मांडले गेले आहेत. 
चंद्रकुमार बोस यांच्याप्रमाणेच अनेक अभ्यासकांनी आपली मत मांडली आहेत. अनेक अभ्यासकांनी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल संशोधन करण्याचा सतत प्रयत्न करुन अनेक तथ्य जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय जपान आणि जर्मनीने भारताच्या स्वतंत्र्यासाठी सुभाषबाबूंना खूप मदत केली होती. त्यांच्याकडेही अनेक पुरावे उपलब्ध आहेत. त्यांचाही खूलासा आणि सत्यता या गोपनिय फाईल्समुळे प्रकाशात येईल. नेताजींच्या फाईल्स आता सार्वजनिक केल्या असल्या तरी अजून त्या आपल्याला वाचायला उपलब्ध नाहीत. लवकरच सर्व देशवासियांना वाचायला त्या उपलब्ध होतील आणि सर्व तथ्य समोर येतील अशी आशा आहे. स्वातंत्र्यापुर्वी ब्रिटीशांनी सुभाषबाबूंना खूप त्रास दिला, तर ती छळाची परंपरा कॉंग्रेसने स्वातत्र्यानंतरही आजतागयात चालू ठेवली होती. आता मात्र नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबाबतीत गुढता राहणार नाही आणि सत्य जगासमोर येण्याची आशा बळावली आहे. नेताजींच्या फाईल्स सार्वजनिक करण्यामागे पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे राजकारण असल्याचे बोलले जातेय. तर काहींनी भाजपा नेताजींची समर्थक आहे आणि त्याचे श्रेय भाजपा घेण्याची शक्यता होती त्यामुळे ममतादीदींनी या फाईल्स जाहीर करुन भाजपावर कुरघोडी केल्याची चर्चा सुरु आहे. ममता बॅनर्जी यांच्या राजकारणापेक्षा नेताजी हा विषय देशाच्या जिव्हाळ्याचा आहे. यात कॉंग्रेसची करणी मात्र आजपर्यंत जशी वाईट होती तशी याही बाबतीच वाईट ठरली आहेत. पण आता जनतेला यातील सत्य कळाल्यानंतर त्याची फळे कॉंग्रेसला विशेषत: सोनिया आणि राहूल गांधींना जनता भोगायला लावेल हे निश्‍चित. सुभाषबाबूंचा आत्मा कॉंग्रेसला क्षमा करणार नाही!
•चौफेर : अमर पुराणिक•
मागच्या निवडणूकीत लालूप्रसाद यादव यांच्या ‘जंगलराज’च्या विरोधात प्रचार करुन नीतिश कुमारांनी सत्ता काबिज केली होती. आता तेच लालूप्रसाद यादव यांच्या ‘जंगलराज’मध्ये सामिल झाले आहेत. त्यामुळे जनता यावेळी नीतिश कुमार यांना साथ देण्याची शक्यता नाही. नीतिश कुमार यांना आसंगाशी संग भोवणार आहे.
बिहार विधानसभा निवडणूकीच्या तारखा नुकत्याच जाहीर झाल्या आहेत. जशा तारखा जाहीर झाल्या तसा निवडणूकीला रंग चढला आहे. १२ ऑक्टोबर पासून ५ नोव्हेंबर दरम्यान ५ टप्प्यात होणार्‍या या निवडणूकीचे निकाल दिवाळीपुर्वीच म्हणजे ८ नोव्हेबर रोजी जाहीर होतील. तेव्हा जिंकणार्‍या पक्षाची दिवाळी आणि हरणार्‍यांचा शिमगा होणार हे सांगायला नको. प्रत्येक पक्षांची मोर्चेबांधणी सुरु आहे. जागावाटप जाहीर करण्यात भाजपाने बाजी मारली आहे. युती-प्रतियुतीच्या राजकारणाने वेग घेतला आहे. शिवाय महत्त्वाची बाब म्हणजे बिहारमधील ३७ जिल्ह्यांपैकी २९ जिल्हे नक्सल प्रभावीत आहेत त्यामुळे निवडणूकीत जास्त सावधता बाळगण्याची जबाबदारी प्रशासनावर येऊन पडली आहे.
निवडणूकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून बिहारमधील राजकारणाने वेगवेगळे मांडे घेण्यास सुरुवात केली आहे. विद्यमान मुख्यमंत्री नीतिश कुमार, माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव, मुलायमसिंह यादव आदींनी जनता परिवार स्थापन केला आणि लगेच काडीमोडही घेतला. त्यामुळे आता लालूप्रसाद यादव आणि नीतिश कुमार एकटे पडले आहेत. बिहारमध्ये चाललेल्या राजकीय गदारोळाकडे पाहता असे दिसून येतेय की, प्रत्येक बाब भाजपाच्या पथ्यावर पडते आहे. अनेकांची राजकीय समिकरणे आणि आखाडे भाजपाचा विजयाचा मार्ग प्रशस्त करत आहेत असे सध्यातरी चित्र आहे. कालच मुलायमसिंह यादव यांनी तीसरी आघाडी जाहीर केली आहे. त्यात शरद पवारांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस, पी.ए. संगमा यांचा पक्ष, देवेंद्र प्रसाद यादव यांचा समाजवादी जनता दल यांचाही समावेश आहे. हे कमी होते म्हणून की काय असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमनेही अकस्मातपणे बिहार विधानसभा निवडणूकीत उडी घेतली आहे. एमआयएम मोठ्‌याप्रमाणात उमेदवार उभे करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे नीतिश कुमार, लालूप्रसाद यादव व कॉंग्रेस यांचे धाबे दणाणले आहेत.
आजपर्यंत बिहारचे राजकारण हे मोठ्‌याप्रमाणात दलित मते आणि मुस्लिम मतपेटीवर नजर ठेवूनच खेळले गेले आहे. लालूप्रसाद यादव, नीतिश कुमार आणि कॉंग्रेसने मुसलमान मतांवर नजर ठेऊन आजपर्यंतच्या सर्व खेळी खेळल्या आहेत. त्यामुळे आता ओवेसींच्या एमआयएमने बिहारच्या निवडणूकीत उडी घेतल्यामुळे कॉंग्रेस, लालू आणि नीतिश यांच्या मुस्लिम मतांच्या गणिताचा फज्जा उडाला आहे. एमआयएम मोठ्‌याप्रमाणात मुस्लिम मते काबीज करण्याची शक्यता आहे. जर तसे झाले तर लालू, कॉंग्रेस आणि नीतिश यांची दयनिय अवस्था होणार आहे. बिहारमध्ये मुस्लिम मतांची संख्या १६ टक्क्याहूनही अधिक असल्याचे बोलले जातेय काही ठिकाणी मुस्लिम मतांची टक्केवारी २२ टक्के नोंदवली आहे. त्यामुळे  नेमका आकडा जरी मिळाला नसला तरी १६ टक्के मुस्लिम मते कॉंग्रेस, नीतिशकुमार आणि लालूप्रसाद यांच्यापासून दुरावली आहेत. ही एक गठ्ठा मते ओवेसीच्या एमआयएमला जातील. सेक्यूलरवादाचे घाणेरडे राजकारण खेळत सत्तेला सोकावलेल्या कॉंग्रेसला आणि लालूप्रसाद यादव, नीतिश कुमार यांना मात्र याचा खूप मोठा फटका बसणार आहे. एमआयएमला जास्त जागा जिंकता येणार नसल्या तरी ओवेसीचे उमेदवार मोठ्‌याप्रमाणात कॉंग्रेस, लालू, नीतिश कुमार यांचे उमेदवार पाडणार हे मात्र निश्‍चित आहे.
हे कमी होते की काय म्हणून मुलायमसिंह यादव यांचा समाजवादी पक्ष आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने तिसरी आघाडी स्थापन करुन आणखी गोची करुन ठेवली आहे. काल मुलायमसिंह यादव यांनी भाजपा आणि कॉंग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही तिसरी आघाडी उघडली असल्याचे सांगितले. मुळात कॉंग्रेसचे बिहारमधील अस्तित्व खुप नगण्य आहे. त्यामुळे कॉंग्रेस सत्तेत येण्याचा प्रश्‍नच येत नाही. राहता राहिला भाजपा. भाजपा सत्तेचा सर्वात प्रबळ दावेदार आहे. जनतेचा कौल, मोदींच्या विकासकामांचा सपाटा आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांचे सुत्रबद्ध नियोजन यामुळे भाजपा बिहार विधानसभेच्या निवडणूकीतही बाजी मारेल अशीच सध्याची स्थिती आहे. भाजपाने १६० जागा घेतल्या आहेत. तर रामविलास पासवान यांच्या पक्षाला ४० जागा दिल्या आहेत.  जागावाटपाचे हे प्रमाण असे असले तरीही भाजपा कमी जागा घेऊन जास्त जागा निवडून आणण्यात यशस्वी होईल. साधारणपणे लोकसभेच्या निवडणूकांप्रमाणेच बिहार विधानसभेतही भाजपा १६० पैकी कमीतकमी १२० जागा निवडून आणण्याचा प्रयत्न करेल. बिहारमधील काही तज्ज्ञांच्यामते भाजपा एकटाच बहूमताचा आकडा गाठेल अशी स्थिती आहे. एका सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की बिहार विधानसभेच्या २४३ जागांपैकी एकटी भाजपा १२५ जागा जिंकेल. शिवाय रामविलास पासवान यांचा पक्षही बळकट आहे. यावेळी दलित मते मोठ्‌याप्रमाणात पासवान यांना मिळतील. शिवाय जितनराम मांझी हे देखील युतीत आहेत. त्यांचा किती प्रभाव पडेल हे सांगणे सध्यातरी अवघड आहे पण रालोआला त्यांचा उपयोग नक्कीच होईल.
बिहारमध्ये आजपर्यंत जातीचे राजकारण मोठ्‌याप्रमाणात चालत आले आहे. त्याचाच आखाडा बांधून नीतिश कुमार, लालू आणि कॉंग्रेस चालली आहे. बिहार मध्ये यादव १४ टक्के, दलित १५ टक्के, राजपूत ५ टक्के, वैश्य ७ टक्के, ब्राह्मण ६ टक्के, कायस्थ २ टक्के, भूमिहार ५ टक्के, कोइरी ७ टक्के, कुर्मी ४ टक्के आणि मुसलमान १५ टक्के आहेत. या जातींच्या मतांची विभागणी कशी होते ते निकालाच्यावेळीच कळणार आहे. अशी जातींची आकडेवारी असली तरी यावेळी खरा निर्णायक मतदार ठरणार आहे तो वेगळाच. साडे सहा कोटी बिहारी मतदारांपैकी ५६ टक्के मतदार हा १८ ते ४० वयोगटातील आहे आणि जवळजवळ ४२ लाख तरुण मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहे. आणि हा पहिल्यांदा मतदान करणारा मतदारच निर्णायक ठरेल. कारण बिहारमधील ‘जंगलराज’ला बिहारचा तरुण कंटाळला आहे. मागच्या निवडणूकीत लालूप्रसाद यादव यांच्या ‘जंगलराज’च्या विरोधात प्रचार करुन नीतिश कुमारांनी सत्ता काबिज केली होती. आता तेच लालूप्रसाद यादव यांच्या ‘जंगलराज’मध्ये सामिल झाले आहेत. त्यामुळे जनता यावेळी नीतिश कुमार यांना साथ देण्याची शक्यता नाही. नीतिश कुमार यांना आसंगाशी संग भोवणार आहे.
पंतप्रधान मोदींचा जादूई करिश्मा बिहारच्या निवडणूकीतही दिसणारच आहे. कारण मोदी यांनी गेल्या वर्षभरात ज्या पद्धतीने विकासकामे सुरु केली आहेत ती बिहारची जनता पहातच आहे. शिवाय बिहारच्या निवडणूकीत पुन्हा एकदा अमित शहा यांचे निवडणूक नियोजन कौशल्य दिसू लागले आहे. बिहारमध्ये ज्यापद्धतीने त्यांनी नियोजन केले आहे ते पाहता भाजपा स्पष्ट बहूमत मिळवेल असे दिसते. अमित शहा यांनी बिहारच्या भाजपा कार्यकर्त्यात चांगले चैतन्य निर्माण केले आहे. त्याचे परिणाम निवडणूकीच्या निकालात दिसून येतीलच. अर्थात निवडणूकीला अजून महिनाभराचा अवधी आहे. या कालावधीत कोणाचे फारडे झुकते आणि कोणाचे रिकामे होते हे दिसेलच. पण भाजपा आपले पारडे शेवटपर्यंत झुकतेच राखेल अशी शक्यता आहे.
•चौफेर : अमर पुराणिक•
जेव्हा कॉंग्रेसची सत्ता होती, संपुआची सत्ता होती तेव्हा सरकारने हा प्रश्‍न सोडवण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही, सैनिकांच्या या मागणीप्रती सरकार उदासिन होते. न सरकारमध्ये या मागण्या पुर्ण करण्याची हिंम्मत होती ना इच्छाशक्ती! आणि आता मोदी सरकारने  तत्काळ वन रँक वन पेन्शन लागू केल्यानंतर त्याचे श्रेय लाटण्याचा अतिशय घृणास्पद प्रकार कॉंग्रेस करत आहे. सोनिया गांधी आणि राहूल गांधी याचे श्रेय लाटण्यासाठी निर्ल्लज्जासारखा प्रयत्न करत आहेत. हे कॉंग्रेसचे कृत्य केवळ हास्यास्पदच नाही तर दु:खद देखील आहे.
नरेंद्र मोदी सरकारने ‘वन रँक वन पेन्शन’ची घोषणा नुकतीच केली. माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीय आणि युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या विधवांच्या गेल्या ४० वर्षांच्या संघर्षाला इतक्या प्रदिर्घ कालावधीनंतर यश आले आहे. मोदी सरकारचा हा निर्णय म्हणजे स्वतंत्र भारतातील सर्वात मोठा निर्णय म्हणता येईल. कारण सीमेवर आपल्या प्राणांची बाजी लावणार्‍या भारतीय सैनिकांसाठी सरकारने उल्लेखनीय आणि कल्याणकारी पाऊल उचलले आहे असे म्हणावे लागेल. कारण आजपर्यंत भारतीय सैनिकांच्या मागण्याकडे कोणत्याही सरकारने विशेष लक्ष दिले नव्हते. गेल्या चार दशकांपासून कॉंग्रेस सरकारने सैनिकांच्या मागण्यांना किंमतच दिली नव्हती. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी वन रँक वन पेन्शनची घोषणा करुन माजी सैनिक, शहीद जवानांच्या विधवांची गेल्या चार दशकांची तपश्‍चर्या, त्याग आणि सेवेबद्दल देशाच्यावतीने हा मानाचा मुजरा आणि कृतज्ञतेची सलामी दिली आहे.
सशस्त्र सेनेचे जवान अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सीमेचे रक्षण करत असतात. आपल्या आप्तजनांपासून महिनोनमहिने दूर राहून देशवासीयांच्या संरक्षणात गुंतलेले असतात. आपल्या प्राणांचे मोल देऊन देशाचे संरक्षण करतात अशा त्यागी आणि शूरांना आजपर्यंतच्या सरकारने असे काही देणे तर दूरच पण साधा सन्मानही दिला नाही. जगभरात सैनिकांना प्रेम आणि सन्मान दिला जातो पण आपल्या देशात मात्र सरकारकडून सैनिकांच्या गरजांकडे दुर्लक्ष केले गेले आहे. पंतप्रधान मोदी यांनी गेल्या ४० वर्षांपासूनच्या मागणीला प्रतिसाद देऊन सैनिकांच्या सन्मानाचीही पावतीच दिली आहे. देशाच्या आत्मसन्मानाच्यादृष्टीने याचे खूप महत्त्व आहे. देशाची निस्वार्थ सेवा केलेल्या २५ लाख माजी सैनिक आणि त्यांच्या परिवारांबाबत आपल्या सरकारचे उत्तरदायित्व अतिशय निराशजनक होते. कॉंग्रेस सरकारच्या या कृतघ्न भूमिकेचे चटके जवानांनी सोसले आहेत.
या मागणी बाबतीत गेल्या दहा वर्षांतील संपुआ सरकारची भूमिका अतिशय खेदजनक राहिली आहे. २००६ साली वन रँक वन पेन्शन लागु केली नाही तर माजी सैनिकांनी आपली पदके परत करण्याची घोषणा केली होती. पण कॉंग्रेसला विशेषत: सोनिया गांधींना त्याची चिंता वाटली नाही. अखंडपणे सैनिकांच्या मागण्याकडे संपुआ सरकारने दुर्लक्षच केले. सैनिकांच्या कोणत्याही मागणीत संपुआ सरकारला रुची नव्हती. देशासाठी प्राणांची आहूती देणार्‍या सैनिकांप्रती कोणतेही दायित्व ते सरकार मानत नव्हते. त्यांना सैनिक पदकं परत करताहेत याची लाजही वाटली नाही. शेवटी पंतप्रधान मोदी यांनी गेल्या ९ वर्षांपासूनच्या संघर्षाला  हाक दिली आणि सैनिकांना दिलासा दिला. जेव्हा कॉंग्रेसची सत्ता होती, संपुआची सत्ता होती तेव्हा सरकारने हा प्रश्‍न सोडवण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही, सैनिकांच्या या मागणीप्रती सरकार उदासिन होते. न सरकारमध्ये या मागण्या पुर्ण करण्याची हिंम्मत होती ना इच्छाशक्ती! आणि आता मोदी सरकारने  तत्काळ वन रँक वन पेन्शन लागू केल्यानंतर त्याचे श्रेय लाटण्याचा अतिशय घृणास्पद प्रकार कॉंग्रेस करत आहे. सोनिया गांधी आणि राहूल गांधी याचे श्रेय लाटण्यासाठी निर्ल्लज्जासारखा प्रयत्न करत आहेत. हे कॉंग्रेसचे कृत्य केवळ हास्यास्पदच नाही तर दु:खद देखील आहे.
केवळ वन रँक वन पेन्शनचाच प्रश्‍न नव्हता तर सैनिकांना मतदानाचा हक्क देण्याबाबतीत आणि राष्ट्रीय सैन्य स्मारक निर्माण करण्याबाबतीतही संपुआ सरकारची भूमिका अशीच नकारात्मक होती. दहा वर्षांच्या प्रदिर्घ मागणीनंतर २०१४ च्या सार्वत्रिक निवडणूकीच्या तोंडावर जवानांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न केला. निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन ५०० कोटींची तरतूद केली. पण निवडणूकीच्या तोंडावर केलेले हे राजकारण सैनिक जाणून होते. केवळ राजकीय स्वार्थ डोळ्यासमोर ठेऊन आपल्या तोंडाला पाने पुसली जात आहेत हे सैनिकांनाच नव्हे तर सर्वसामान्य जनतेलाही कळून चूकले होते.
केंद्र सरकारला वन रँक वन पेन्शन योजनेसाठी आठ ते दहा हजार कोटी रुपयांपर्यंत खर्च येणार आहे. मोदी सरकारने ज्या परिस्थितीत हा निर्णय घेतला आहे ते पाहता मोदी सरकारचे कौतूक करावे तेवढे थोडे आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत सुधारणा होत आहे. पण अजून म्हणावी तितकी सुधारणा झालेली नाही. कारण जागतिक मंदीचे संकट असताना अर्थव्यवस्थेतील सुधारणेची गती कायम राखणे म्हणजे सरकारची सत्वपरिक्षाच ठरणार आहे. केवळ १६ महिन्यापुर्वी मोदी सरकार सत्तेत आले. या सोळा महिन्यात मोदी सरकारने चांगली प्रगती साधली आहे. विशेष म्हणजे केवळ सोळा महिन्याचे सरकार असतानाही मोदी यांनी व्यापक आर्थिक खर्च असणारी ही योजना जाहीर केली हे येथे उल्लेखनीय आहे. सरकारने  राष्ट्रसेवा आणि देशप्रेमाप्रती आपली प्रतिबद्धता प्रकट केली आहे. जे लोक सशस्त्र सेनेतचा हिस्सा बनून देशाची सेवा करत आहेत. त्यांना सरकारने अश्‍वस्त केले आहे की, संपुर्ण देश आणि सरकार त्यांच्या आणि त्यांच्या परिवारांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे.
राज्यसभेचे सदस्य राजीव चंद्रशेखर यांनी या मुद्द्यांवर विशेष प्रकाश टाकला आहे. त्यांनी सैनिकांच्या मागण्यांसाठीच राजकारणात उडी घेतली. बी. एस. कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखालील राज्यसभा समितीत २०११ साली याचिका दाखल केली होती. शेवटी मोदी सरकारमुळे यात यश मिळाले. याशिवाय मोदी सरकार सैनिक कल्याण कार्यक्रम, दिल्ली येथे राष्ट्रीय सैन्य स्मारक बांधणे, सशस्त्र सेना अनुबंध विधेयक आदी योजना पुढील काळात हाती घेत आहे. अनेक माजी सैन्य अधिकार्‍यांनी स्वातंत्र्यानंतरचे मोदी हे सर्वात प्रबळ नेतृत्व असल्याचे आणि सैन्य आणि सैनिकांची काळजी घेणारे पंतप्रधान असल्याचे म्हंटले आहे. आता वन रँक वन पेन्शन मंजुर झाल्यामुळे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी हस्तक्षेप करुन ज्या सैनिकांनी पदके परत केली आहेत त्यांना पुन्हा ती पदके सन्मानपुर्वक परत द्यावीत.
•चौफेर : अमर पुराणिक•
दुसर्‍याचा हक्क मारुन खाण्याची मानसिकता बदलणे खूप आवश्यक आहे. सामाजिक समरसतेचे धडे पुन्हा पुन्हा घेणे आणि देणे गरजेचे बनले आहे. हीन राजकारणाचा वापर करुन कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे उगवणारे केजरीवाल, हार्दिक पटेलसारखे अनेक लोक असतात. आरक्षणाच्या राजकारणाला बळी पडून समाजाची, देशाची राखरांगोळी न करता प्रगती कशी साधायची याचा विचार करणे आवश्यक आहे. आता त्या त्या समाजातील लोकांनीच ठरवायचे आहे की त्यांनी विकासाच्या राजकारणाला साथ द्यायची की आरक्षणासारख्या राजकारणाचा साथ द्यायची?
गुजरातमधील सधन आणि संपन्न पटेल/पाटीदार समाज जातिगत आधारावर आरक्षणाची मागणी करतोय. हार्दिक पटेल नावाचा युवक स्वत:ची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी जातीय आरक्षणचे शस्त्र उगारतोय. त्याने छेडलेल्या या आंदोलनात मोठ्‌याप्रमाणात हिंसाचार करण्याचा प्रयत्न केला गेला. खरंच एखाद्या समाजाच्या भल्यासाठी हे आंदोलन होतं की केवळ राजकीय स्वार्थ साधण्यासाठी हे आंदोलन केले गेले हे येत्या काळात दिसून येईलच. पण या आंदोलनाला केजरीवाल आणि नीतिशकुमार यांचा पाठींबा असल्याचाही आरोप होत आहेत. हार्दिक पटेल आणि केजरीवाल यांची छायाचित्र सोशल मिडियावर व्हायरल झाली आहेत. येत्या काळात यातील तत्थ समोर येईलच. पण सामाजिक समरसतेचा विचार केला असता ज्या जाती सामाजिक आणि अर्थिकरुपाने संपन्न आणि समृद्ध आहेत त्यांना आरक्षण हवे आहे हे चित्र चांगले म्हणता येणार नाही. पटेल समाज गुजरातमध्ये, भारतात आणि परदेशातही अतिशय समृद्ध आहे. अशा समाजाने आरक्षणाची मागणी करावी हे कोडेच आहे. गुजरातप्रमाणेच उत्तर भारतात जाट आणि गुर्जर समाज, महाराष्ट्रात मराठा समाजही जातीच्या आधारावर आरक्षण मिळवण्यासाठी आंदोलनाच्या तयारीत आहे. सधन समाज आरक्षणासाठी आक्रमक होतोय पण त्यांनी त्याचा पुन्हा पुन्हा विचार करावा की यामुळे समाजिक समरसतेला तडा जाणार नाही ना?
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनुसुचित जाती आणि जमातींना सामाजिक आणि आर्थिक रुपात राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दहा वर्षे सरकारी नोकर्‍यांमध्ये आरक्षण दिले गेले. नंतर दहा वर्षांची सीमा वाढत गेली. पण तेव्हाच्या सरकारने आरक्षणाचा लाभ संबंधित समाजाला मिळतोय की नाही हे पहाण्याचे कष्ट घेतले नाहीत. नंतर १९९० साली व्ही.पी. सिंह सरकारने राजकीय हेतूने मंडल आयोगाच्या शिफारसींवर इतर मागासवर्गीयांना आरक्षण दिले गेले. इतर मागासवर्गीयांना आरक्षण मिळणे आवश्यक होतेच पण इतर मागासवर्गीयांच्या विकासापेक्षा राजकारणाचे हेतूच साध्य करण्याचे प्रयत्न झाले. तेव्हापासून आरक्षण हे राजकारणासाठी वापरले जाणारे प्रभावी शस्त्र ठरले. प्रत्येक समाजच आरक्षणाची मागणी करु लागला. मुळात भारतातील सर्वच जातीत थोडयाफार प्रमाणात गरीबी आहेच. काही समाजात जास्त आहे तर काही समाजात कमी आहे. आजच्या पिढीतील काही दलित समाजातील तरुण आरक्षणाचा लाभ न घेता खुल्या स्पर्धेत उतरताना दिसताहेत ही खूपच चांगली बाब आहे. मागच्या पिढीत त्यांची स्थिती चांगली नव्हती, पण आरक्षणाचा लाभ घेऊन स्थिती सुधारल्यानंतर त्यांच्या आजच्या पिढीतील बरेच तरुण आरक्षणाचा आधार सोडून देत आहेत. त्याचा लाभ समाजातील अजूनही जे घटक सक्षम नाहीत त्यांना मिळू शकतो. ही अतिशय अनुकरणीय बाब आहे. असे असताना सधन कुटुंबातील, समाजातील लोक आरक्षणासाठी हिंसक वळणावर उतरले ही अतिशय चिंताजनक बाब आहे. गेल्या काही वर्षांपासून हे पहायला मिळतेय की  प्रत्येक समाजाला आरक्षण हवे आहे. त्यासाठी ते समाज स्वत:ला मागास घोषित करत आहेत. जर पटेल, जाट, मराठा, गुर्जर समाज स्वत:ला मागास म्हणवून आरक्षण मिळवू पहात असेल तर त्या समाजांनी याचा पुर्नर्विचार करावा. पटेल समुदायाने हार्दिक पटेल याच्या नादी लागून जसे आंदोलन केले आणि हिंसाचार केला हे समर्थनीय होऊच शकत नाही.
या आंदोलनापाठीमागे समाजहितापेक्षा राजकारणाचे पैलूच जास्त दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी विकासाच्या राजकारणाची कास धरत देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी मार्गक्रमण करत आहेत. त्यांना त्यांचे विरोधक पाच वर्षांचा काळही देऊ इच्छित नाहीत. त्या विकास मार्गात अडथळे आणण्याचे नाना प्रयत्न सुरु आहेत. मागच्या महिन्यात संसदेचे आधिवेशन गोंधळ घालून वाया घालवले. एकही निर्णय होऊ दिला नाही. तरीही मोदी त्याच वेगाने आणि ताकदीने विकासाच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. मोदी विरोधात गेल्या दहा, बारा वर्षात अनेक शस्त्र वापरण्यात आली. त्यांना नामोरहम करण्याचे अनेक प्रयत्न झाले. तीस्ता सेटलवाड पासून ते आजच्या केजरीवाल, हार्दिक पटेलपर्यंत अशी अनेक शस्त्र वापरण्यात आली. पण ती सर्व शस्त्र मोदींच्या प्रभावासमोर निष्प्रभ ठरली. मोदींना नामोहरम करण्यासाठी अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी जंग जंग पछाडले पण ते मोदींना पछाडू शकले नाहीत. अशा लोकांना, आंतरराष्ट्रीय संस्थांना भारताचा विकास होणे मान्य नाही. म्हणूनच त्यांनी तीस्ता सेटलवाड, अरुंधती राय, अरविंद केजरीवालसारखी राष्ट्रद्रोही आपत्य जन्माला घातली. कॉंग्रेस हेही त्यांचेच १०० वर्षांहून जूनं आपत्य आहे. मोदीविरोधात आजपर्यंत एक शस्त्र प्रभावी ठरले नाही. उलट या विरोधात मोदींची प्रतिभा उजळून, तावून-सुलाखून निघाली.
मोदीच भारताला प्रगतीपथावर नेऊ शकतात हे ते जाणून आहेत त्यामुळेच आता ते देशभर आरक्षणाचा मुद्दा पेटवू पहात आहेत. यात देशांतर्गत राजकीय विरोधक कोणत्याही थराला जाऊन  मोदींना रोखू इच्छितात. नीतिशकुमारांनीही पटेल आरक्षणाला पाठिंबा याचसाठी दिला आहे. ते मोदींच्या गृहराज्यात अशांतता पसरवू पहात आहेत. जेणेकरुन बिहारच्या निवडणूकात मोदींनी जास्त हस्तक्षेप करु नये. बिहारच्या प्रचाराच्या व्यासपीठावर सोनिया, लालू, नितीश, केजरीवाल सगळेच एकत्र झालेले दिसताहेत. पटेल आंदोलनाच्या पाठिंब्यामागचे हे राजकारण आता लपून राहिलेले नाही. कारण, जदयूचे अध्यक्ष शरद यादव यांनी नितीश कुमारांंच्या पाठींब्याच्या विधानाचा बुरखा फाडला आहे. शरद यादव म्हणाले की, नीतिश कुमार यांनी गुजरातच्या पाटीदार आंदोलनाला समर्थन देण्याची घोषणा केली आहे ती अयोग्य आहे. पटेल समाज संपन्न आहे, त्यांना आरक्षणाची गरज नाही. शरद यादव यांचा खुलासा हाच संकेत देतो की, नीतिश कुमार ज्या पद्धतीने जातीच्या आधारावर एक दगडात दोन पक्षी मारु इच्छितात त्यात जदयुचे इतर नेते सामील नाहीत. इकडे गुजरातची शांतता भंग करु पहाणार्‍या नीतिश कुमारांच्या जनता परिवारात परवाच फुट पडली आणि सपा आघाडीतून बाहेर पडली. त्यामुळे अशा नेत्यांनी आतातरी संकुचित राजकारणापासून दूर राहण्याचा विचार करावा.
यात अरविंद केजरीवालही मागे नाहीत. दिल्लीच्या जनतेला दिलेली आफाट आश्‍वासन वेशीला टांगून दिल्लीकरांना वार्‍यावर सोडून ते हे नुसते उपद्वयाप करत आहेत. अमदाबादमधील लोक सांगतात की लोकसभा निवडणूकीच्यावेळी हा हार्दिक पटेल केजरीवालसोबत होता. सध्या त्याचा आपशी किती संबंध आहे त्याबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत. साडे सहा कोटी लोकसंख्या असलेले आणि गुजरातमध्ये संख्याबळ एक कोटी ८० लाख असलेला पटेल समाज शेती, व्यापार, उद्योग क्षेत्रात सर्वत्र आघाडीवर आहे. राजकारणातही त्यांचे वर्चस्व आहे. गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेलही त्याच समाजाच्या आहेत. पाटीदार समाजाचे गुजरातमधील ७ खासदार आहेत तर देशभरातून ११७ खासदार संसदेत पाटीदार समाजाचे नेतृत्व करतात. इतक्या मोठ्‌याप्रमाणात प्रतिनिधित्व मिळत असताना हा समाज समाधानी नाही का?
गुजरातमध्ये ते कोण कोण लोक आहेत जे मोदींचा व्यूह तोडू पहात आहेत? गुजरात बाहेर तर नीतिश कुमार, केजरीवाल, कॉंग्रेस डर्टी पॉलिटिक्स खेळत आहेत हे सगळ्या जगाला दिसत आहे. पण गुजरातमधील पटेल समाजाची नेमकी मानसिकता अजून स्पष्टपणे कळून येत नाहीये. कारण आजपर्यंत आरक्षणाला विरोध करणार पटेल समाज अचानकच आरक्षण मागू लागला याचे उत्तर अजून गुलदस्त्यातच आहे. एक मात्र खेदाने म्हणावे लागेल की आपल्या देशात जे संपन्न आहेत ते अजून संपन्न होऊ इच्छितात, जो ताकदवान आहे तो अजून ताकतवान होऊ इच्छितोय, प्रत्येक ताकदवान दुसर्‍याचा हक्क मारुन खावू इच्छितोय याला काय म्हणावे. समाजाची ही मानसिकता बदलणे खूप आवश्यक आहे. सामाजिक समरसतेचे धडे पुन्हा पुन्हा घेणे आणि देणे गरजेचे बनले आहे. हीन राजकारणाचा वापर करुन कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे उगवणारे केजरीवाल, हार्दिक पटेलसारखे अनेक लोक असतात. असल्या राजकारणाला बळी पडून समाजाची, देशाची राखरांगोळी न करता प्रगती कशी साधायची याचा विचार करणे आवश्यक आहे. आता त्या त्या समाजातील लोकांनीच ठरवायचे आहे की त्यांनी विकासाच्या राजकारणाला साथ द्यायची की आरक्षणासारख्या राजकारणाचा साथ द्यायची? अन्यथा अराजक माजून देश रसातळाला जायला वेळ लागणार नाही.