पाकिस्तानच्या कथनी आणि करणीतील विरोधाभास

•चौफेर : अमर पुराणिक•

समुद्रीमार्गाने भारतात घुसुन मुंबईवर ज्या तर्‍हेचा हल्ला २६/११ ला करण्यात आला होता तशीच स्थिती पुन्हा निर्माण होण्याची भीती पोरबंदरच्या घटनेमुळे वाटते. अतिशय भयानक असा २६/११ चा मुुंबईवरील हल्ला अजुनही देशवासीय विसरु शकले नाहीत. तशीच हिंसक आणि हिणकस चाल खेळण्याच्या प्रयत्नात पाकिस्तान असावी अशी शंका  व्यक्त केली जातेय. पाकिस्ताने मुंबईच्या या घटनेनंतर सतत असेच सांगितले की आतंकवादाविरुद्धच्या लढ्‌यात पाक भारतासोबत आहे. परंतु ज्या तर्‍हे च्या राजनीतिक, सैन्य आणि न्ययिक हालचाली झाल्या त्या पाहता पाकिस्तानच्या कथनी आणि करणी यात कोेणतेही साम्य दिसून येत नाही. पाकिस्तानच्या बोलण्यातील आणि कृतीतील विरोधाभास संपुर्ण जगाला आणि भारताला नवा नाही.

३१ डिसेंबर आणि १ जानेवारी दरम्यान रात्री गुजरात जवळील पोरबंदरपासून ३६५ किलोमीटर अंतरावर आरबी समुद्रात एक संदिग्ध पाकिस्तानी नाव भारतीय तटरक्षक दलाने अडवण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर या नौकेत स्फोट झाला आणि या नौकेतील लोक ठार झाले. नव्यावर्षाच्या सुरुवातीलाच पाकिस्तानने ही कुरापत केली. या घटनेने मुंबईच्या २६/११ च्या हल्ल्यासारखी भीती देशभर उत्त्पन्न झाली. काही प्रसारमाध्यमांनी मुंबई २६/११ भाग दोन अशा शीर्षकाखाली ही बातमी प्रसिद्ध केली. तशीच स्थिती असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
समुद्रीमार्गाने भारतात घुसुन मुंबईवर ज्या तर्‍हेचा हल्ला २६/११ ला करण्यात आला होता तशीच स्थिती पुन्हा निर्माण होण्याची भीती या घटनेमुळे वाटते. अतिशय भयानक असा २६/११ चा मुुंबईवरील हल्ला अजुनही देशवासीय विसरु शकले नाहीत. तशीच हिंसक आणि हिणकस चाल खेळण्याच्या प्रयत्नात पाकिस्तान असावी अशी शंका  व्यक्त केली जातेय. पाकिस्ताने मुंबईच्या या घटनेनंतर सतत असेच सांगितले की आतंकवादाविरुद्धच्या लढ्‌यात पाक भारतासोबत आहे. परंतु ज्या तर्‍हेच्या राजनीतिक, सैन्य आणि न्ययिक हालचाली झाल्या त्या पाहता पाकिस्तानच्या कथनी आणि करणी यात कोेणतेही साम्य दिसून येत नाही. पाकिस्तानच्या बोलण्यातील आणि कृतीतील विरोधाभास संपुर्ण जगाला आणि भारताला नवा नाही. २६/११ च्या हल्ल्याचे संयोजक आणि आरोपींना पाकिस्तानने केवळ आसराच दिला नाही तर उघड-उघड भारताविरुद्ध आखपाखड केली आणि त्या आरोपींविरुद्ध कोणतीही कारवाई केली नाही. आतंकवाद संपवण्यासाठी पाकिस्तान भारतासोबत असल्याच्या नुसत्याच नाटकी घोषणा करतो, अन्यथा जर त्यांना खरच दहशतवाद संपवायचा असता तर प्रामाणिकपणे दहशतवाद संपवण्यात भारताची साथ दिली असती.
गेल्याच महिन्यात पाकिस्तानात दोन मोठे अतिरेकी हल्ले झाले. वाघा सीमेवरील हल्ला आणि पेशावर शालेय विद्याथ्यार्र्वरील हल्ला. पेशावर येथील घटनेनंतर केवळ पाकिस्तानातील जनताच नव्हे तर भारतातील आणि जगभरातील  लोकांनी शोक व्यक्त केला. पेशावर आतंकवादी हल्ल्याच्या घटनेनंतर असे वाटू लागले की आता तरी पाकिस्तान आतंकवादाविरुद्ध आर-पारची भूमिका घेईल. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी तशी घोषणाही केली होती. परंतु काही दिवसानंतर मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड लखवी या अतिरेक्याला जामीनीवर मुक्त केले. भारतासोबतच जगभरातून याला विरोध झाल्यानंतर पुन्हा लखवीला तुरुंगात पाठवले. या घटनेमुळे पाकिस्तानची न्यायपालिका आणि सरकार यांच्यात ताळमेळ नसल्याचे अधोरेखित होतेच शिवाय यापाठीमागे कुटनीती असल्याचे लपत नाही. त्या तर्‍हेने पाकिस्तानी सेनेविरुद्ध अतिरेक्यांनी मोर्चा उघडला आहे त्यातून हाच संदेश मिळतो की आतंकवादी आता पाकिस्तानी सेनेच्या काबूत नाहीत. किंबहूना अतिरेक्यांना उभे करण्यात आणि पाठींबा देण्यात पाकिस्तानी सेना आणि आयएसआयचे मोठे योगदान आहे. त्यांच्याच अतिरेक्यांकडून आता खुद्द पाकिस्तानच घायाळ झाला आहे. जर पाकिस्तानला आपली लोकशाही टिकवायची असेल, शांती आणि विकासाच्या वाटेवर चालायचे असेल तर आपली भूमिका पाकिस्तानला बदलणे आवश्यक आणि ते पाकिस्तान करताना दिसत नाही.
पाकिस्तानातील एका न्यायालयाने लष्कर-ए-तैयबाचा म्होरक्या जकीउर रहमान लखवी याला ज्या तर्‍हेने जामीन दिला ते पाहून ‘संपुर्ण मानवतेला हा धक्का आहे’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले. मोदी बोलले ते योग्यच बोलले होते. भारताच्या संसदेने पाकिस्तानने लखवीची जामीनीवर सुटका केल्याच्या घटनेवर तीव्र विरोध करत जोरदार टीका केली होती. पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्यानंतर  परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सदनात पाकिस्तान सरकारने लखवी याची जामीनीवर सुटका करण्याचा निर्णय त्वरीत मागे घेण्याच्या मागणी केली. त्यांच्याच देशातील मुलांची अतिरेक्यांनी हल्ला करुन हत्या केल्यानंतर पाकिस्तान सरकारने आतंकवाद संपवण्याच्या वल्गना केलेल्या होत्या. पण लखवी याची सुटका केल्यामुळे या वल्गना खोट्‌या ठरवल्या आहेत. पाकिस्तानने स्वत:च केलेल्या घोषणांची स्वत:च चेष्टा केली आहे. संयुक्त राष्ट्राने लष्कर-ए-तैयबाचा ऑपरेशन कमांडर लखवी आंतरराष्ट्रीय आतंकवादी असल्याचे घोषीत केलेले असताना लखवीविरुद्ध पुरावे नसल्याचा पाकिस्तानने केलेला तर्क न पटणारा आहे. मुंबई हल्ल्याची योजना पाकिस्तानेच रचली असल्याचा थेट आरोप भारताने संयुक्त राष्ट्रसंघात केला आहे. पाकिस्तानजवळ लखवीविरुद्ध पुरवे गोळा करण्यासाठी सहा वर्षांचा कालावधी होता, पुरावे गोळा करुन ते सादर करण्याची जबाबदारी पाकिस्तानची होती. त्यामुळे आता पाकिस्तान याबाबत कोणतीही सारवासारव करु शकत नाही, असे असतानाही निर्लज्जपणे आतंकवादाला खतपाणी घालण्याची भूमिका पाकिस्तान घेतोय.
जम्मू-काश्मिर सीमेवर पाकिस्तानकडून निरंतर संघर्षविरामाचे उल्लंघन होत आले आहे. पाकिस्तानने केलेले हल्ले आता जवानांनबरोबरच सामान्य भारतीय नागरिकांपर्यंत पोहोचत आहेत. गेल्या काही दिवसात दोन जवानांबरोबरच एका महीलेचा या हल्ल्यात मृत्यू झाला. हे मात्र आता थांबवले पाहिजे. मोदी सरकारने तशी भूमिका घेण्यास आता सुरुवात केली आहे. पण आंतरराष्ट्रीय स्तरावरील आर्थिक आणि सामरिक दबावमुळे मोदी सरकारला थेट भूमिका घेता येणे शक्य होणार नाही. काही सामरिक तज्ज्ञांच्यामते २६ जानेवारी रोजी अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा भारतात प्रमुख पाहूणे म्हणून येत आहेत. त्यामुळे पाकिस्तान असे हल्ले करत आहे. तसेही भारतात होणार्‍या मोठ्‌या उत्सवांप्रसंगी हे अतिरेकी हल्ला करण्याचा प्रयत्न करत असतात.
पोरबंदरजवळ जी नाव भारतीय तटरक्षक दलाने रोखली होती ती भारतावर हल्ला करण्याच्या प्रयत्नाने आली नसल्याचे काहींचे म्हणणे होते. पण संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, ही नाव हल्ल्याच्या इराद्यानेच आली होती. कारण त्या नौकेतील लोक पाकिस्तानच्या लष्करी अधिकार्‍यांच्या संपर्कात होते. त्यांची वर्तणूक संशयास्पदच होती. त्यांनी भारतीय तटरक्षकांना संशय येताच ती नौका स्फोट करुन नष्ट का केली? असे अनेक प्रश्‍न उपस्थित होतात. ते सर्व प्रश्‍न संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी उपस्थित करुन ती नौका हल्ल्याच्या इराद्याने आल्याचे ठामपणे म्हटले आहे.
भारतीय जवानांना पाकिस्तानला कायमच जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे. आता जवानांच्या आणि देशवासीयांच्या भावनांशी सुसंगत अशी मोदी सरकारची साथ लाभली आहे. त्यामुळे त्यांना सडेतोड राजनैतिक आणि सामरिक प्रत्त्यूत्तरही दिले जाईल.

0 comments:

Post a Comment